शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

तीन हजार किलो आंब्याचा साठा जप्त

By admin | Updated: May 3, 2014 19:05 IST

बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जाणार्‍या आंब्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी छापेमारी केली.

सचिन राऊत

अकोला - बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जाणार्‍या आंब्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी छापेमारी केली. या छापेमारीत आरोग्यास घातक असलेला सुमारे दोन हजार ८९६ (तीन टन) किलो आंबा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून ट्रकने येत असलेला आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अकोला अन्न व औषध प्रशासन आणि अमरावती येथील दक्षता पथकाने ही कारवाई केली. आंब्याचा साठ्यावर राज्यातील ही पहिली कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.जिल्ह्यात आंब्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून दर तिसर्‍या दिवशी तब्बल ८ ते १० ट्रक कच्चा आंबा विविध ठिकाणांवर आणून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर सदर आंबा बाजारात विक्रीसाठी आणण्यात येत आहे. आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाइडचा वापर करण्यात येत असून, यामध्ये फॉस्फरस आणि अर्सेनिक हे रासायनिक घटक असल्याने हा पिकलेला आंबा यकृत आणि किडनीवर गंभीर परिणाम करतो. यासोबतच आंब्यातील रसाला पिवळा रंग आणण्यासाठी गॅसचा वापर करण्यात येत असून, आंबा सडू नये यासाठीही त्यावर विशेष प्रक्रिया करण्यात येत असल्याचे केंद्रच अकोल्यात असल्याचे लोकमतने समोर आणले होते. या वृत्तानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबई येथील दक्षता पथकाचे सहआयुक्त यांनी दिलेल्या आदेशावरून अमरावती दक्षता पथक आणि अकोला अन्न व औषध प्रशासनाने बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजवर गुरुवारी छापा मारून आरोग्यास घातक असलेला सुमारे दोन हजार ८९६ किलो आंबा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या आंब्याची किंमत दोन लाख रुपये असली तरी अन्न व औषध प्रशासनाने होलसेल दरानुसार या आंब्याची किंमत सुमारे ५५ हजार रुपये सांगितली. जप्त करण्यात आलेल्या आंब्याचा काही साठा नष्ट करण्यात आला असून, उर्वरित साठा जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाचे शरद कोलते, नीलेश ताथोड, रावसाहेब वाकडे, अमरावती दक्षता पथकाचे फरीद सिद्दीकी यांच्या पथकाने केली.