शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

सिंचन विहिरीसाठी तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार पाच लाख!

By संतोष येलकर | Updated: September 14, 2024 18:57 IST

अनुदानाच्या रकमेत एक लाख रुपयांची वाढ; जिल्ह्यात विहिरींची कामे मंजूर

संतोष येलकर, अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाच्या रकमेत ५ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १२ सप्टेंबरपर्यंत मंजूर सिंचन विहिरींच्या कामांसाठी ३ हजार १३५ लाभार्थी शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन सुविधांसाठी शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी यापूर्वी प्रत्येकी चार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत होते.

दरम्यान, बांधकाम विभागाच्या चालू दरसुचीनुसार आणि केंद्र शासनामार्फत १ एप्रिल २०२४ पासून ‘नरेगा ’ अंतर्गत लागू करण्यात आलेले प्रतिदिवस २९७ रुपये मजुरीचे दर विचारात घेता, राज्य शासनाच्या ५ ऑगस्ट रोजीच्या निर्णयानुसार सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी अनुदानाची रक्कम पाच लाख रुपये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार १ एप्रिल २०२४ पासून मंजुरी देण्यात आलेल्या; मात्र कामे सुरू न झालेल्या जिल्ह्यातील ३ हजार १३५ सिंचन विहिरींच्या बांधकामासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.तालुकानिहाय अशी आहेत सिंचन विहिरींची मंजूर कामे !

तालुका विहिरीअकोला ११२अकोट १३३बाळापूर २८१बार्शिटाकळी १२९९मूर्तिजापूर ४८६पातूर ६०७तेल्हारा २१७ 

टॅग्स :Farmerशेतकरी