शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चारमोळी येथे फलक जाळल्याप्रकरणी तिघांना अटक; पोलीस बंदोबस्त कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:01 IST

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारमोळी येथे शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी महापुरुषांचे फलक जाळल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी तिघांना अटक केली. गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त कायम आहे. 

ठळक मुद्देशनिवारी रात्री काही समाजकंटकांनी महापुरुषांचे फलक जाळल्याची घटनागावात तणावपूर्ण शांतता 

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारमोळी येथे शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी महापुरुषांचे फलक जाळल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी तिघांना अटक केली. गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त कायम आहे. चारमोळी येथे शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक जाळल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती.  त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषद शाळेसमोर मोर्चा नेऊन समाजकंटकांच्या अटकेची मागणी केली होती. जमाव आक्रमक झाल्याने गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य पाहता बाळापूरचे उपविभागीय अधिकारी शेख, बाळापूरचे ठाणेदार अनिल ठाकरे, चान्नीचे प्रभारी ठाणेदार मुकुंद वाघमोडे, पातूरचे ठाणेदार देवराव खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी ग्रामस्थांनी चान्नी पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली  होती. चान्नी पोलिसांनी या घटनेचा तपास करून दिनकर खुळे, सतीश देवकर, सुखदास धोंगळे सर्व राहणार चारमोळी यांना अटक केली.  दरम्यान, पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी यांनी घटनास्थळाला भेट देऊन गावातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अटक केलेल्या आरोपींना चान्नी पोलिसांनी पातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. 

टॅग्स :BalapurबाळापूरCrimeगुन्हा