शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अन्नसुरक्षेतून हजारो शिधापत्रिकाधारकांना डच्चू!

By admin | Updated: April 21, 2017 00:32 IST

यवतमाळमध्ये हजारोंचा नव्याने समावेश

सदानंद सिरसाट - अकोलाअन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांची निवड करून त्यांना धान्य पुरवठा सुरू झाला. आता त्यापैकी हजारो शिधापत्रिका वगळून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शिधापत्रिकांची निश्चित संख्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्यानंतर पुरवठा विभागाची अडचण वाढली आहे. कोणते शिधापत्रिकाधारक वगळावे, यासाठी आता हजारो शिधापत्रिकाधारकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ लागू केला. राज्यात अधिनियमाची अंमलबजावणी १ फेब्रुवारी २०१४ पासून सुरू झाली. त्यावेळी ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागातील ४५.३४ टक्के मिळून एकूण ७ कोटी १६ लाख लाभार्थी संख्येला कायद्यानुसार अन्नसुरक्षेचे कवच देण्यात आले. शासनाने १७ डिसेंबर २०१३ रोजीच ही संख्या निश्चित करण्याचे आदेश दिले.त्यानंतर शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यात आले, त्यामुळे पुन्हा पात्र लाभार्थींची संख्या १३ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या निर्णयाने बदलण्यात आली. काही जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षा योजनेतून शिधापत्रिका बाद करण्यात आल्या, तर काही जिल्ह्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. त्यानुसार बदललेल्या लाभार्थी संख्येचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला आहे.जिल्ह्यातील तब्बल ३६८३ शिधापत्रिकाधारकांना आता धान्य मिळण्यापासून वगळण्यात आले आहे. अमरावती विभागातील चार जिल्ह्यामध्ये हजारो शिधापत्रिका वगळल्या, तर यवतमाळ जिल्ह्यात हजारोंचा नव्याने समावेश करण्यात आला. या प्रक्रियेत काही जिल्ह्यात लाभ तर काही जिल्ह्यात लाभार्थींना फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील ३६८४ शिधापत्रिका अपात्रअकोला जिल्ह्यातील ३६८४ शिधापत्रिका अपात्र करण्यात आल्या, त्यामुळे त्या शिधापत्रिकाधारकांना आता धान्याचा लाभ मिळणार नाही. त्यातून कायद्याने मिळणारे अन्नसुरक्षेचे कवच शासनाने काढून घेतले आहे.चार जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारकांना फटकाअमरावती विभागातील पाचपैकी चार जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारकांना फटका बसला आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८२३, वाशिम-६६४, अकोला-३६८४, बुलडाणा-१४३९ असे एकूण ५२२७ शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आले आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात ४४५७ शिधापत्रिकाधारकांना नव्याने लाभ देण्यासाठी निवड केली जाणार आहे.