शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

नऊ प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:12 IST

अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. 

ठळक मुद्देपातूर तालुका १४,१६४ हेक्टरमधील सकल कृषी उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. पातूर तालुक्यात एकूण पाटबंधारे विभागाचे नऊ मध्यम व लघू सिंचन प्रकल्प आहेत. रब्बीच्या हंगामासाठी सिंचन प्रकल्पमधून कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मुख्य कालव्यातून पाटसर्‍याच्या माध्यमातून पोहोचणार्‍या पाण्यावर २४ हजारांहून अधिक शेतकरी गहू, हरभरा ही पिके रब्बीत दरवर्षी घेत असतात. यावर्षी मोर्णा प्रकल्प ७.४ दशलक्ष घनमीटर (१६.९८टक्के), निगुर्णा प्रकल्प १७.४६ द.ल.घ.मी. (६0.५१टक्के), सध्या पारस औष्णिक वीज प्रकल्प आणि शेगाव संस्थान एकूण १२.४८ द.ल.घ.मी. शासकीय आरक्षण, तुळजापूर 0.२९७ द.ल.घ.मी. (३४.१८टक्के), गावंडगाव 0.00 (0.00टक्के), सावरगाव 0.0५४ द.ल.घ.मी. (४.७९ टक्के), पातूर तलाव 0.६६५ द.ल.घ.मी. (३५.८८टक्के), विश्‍वमित्री प्रकल्प ३.२५ द.ल.घ.मी. (३२.५१टक्के), संग्राहक तलाव झरंडी 0.४१६ द.ल.घ.मी. (२३.१६टक्के) व हिवरा तलाव 0.२३८ द.ल.घ.मी. (१0.३८ टक्के) एवढीच पाण्याची पातळी आहे.यावर्षी पातूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील हजारो शेतकर्‍यांनी खरिपातील अवर्षणप्रवणतेने हवालदिल झाल्यानंतर नव्या उमेदीने रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची संपूर्ण तयारी मोठय़ा जिकरीने पूर्ण केली होती. मात्र, सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने मोठे संकट शेतकर्‍यांवर कोसळले आहे. पातूर तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक पावसाची हजेरी असते मात्र ह्यावर्षी ४00 मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरिपाच्या हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनचे पीक हातातून गेले. उत्पादन खर्चही निघाला नाह. मात्र, शासनाने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत शेतकर्‍यांना अद्यापपयर्ंत केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून खरिपातील अवर्षणप्रवणतेने झालेल्या नुकसानाची भरपाई भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची केलेली संपूर्ण तयारी वाया गेली आहे. 

पातूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठा कमी आहे, सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी कोणत्याही प्रकल्पात नाही - अत्तरकार, शाखा अभियंता, सिंचन विभाग पातूर                             पातूर तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पावरील यावर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला आहे. त्या संदर्भातील नियोजन सभा रद्द करण्यात आली आहे. - अनिल राठोड,  उप अभियंता सिंचन शाखा अकोला 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण