शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

नऊ प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:12 IST

अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. 

ठळक मुद्देपातूर तालुका १४,१६४ हेक्टरमधील सकल कृषी उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. पातूर तालुक्यात एकूण पाटबंधारे विभागाचे नऊ मध्यम व लघू सिंचन प्रकल्प आहेत. रब्बीच्या हंगामासाठी सिंचन प्रकल्पमधून कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मुख्य कालव्यातून पाटसर्‍याच्या माध्यमातून पोहोचणार्‍या पाण्यावर २४ हजारांहून अधिक शेतकरी गहू, हरभरा ही पिके रब्बीत दरवर्षी घेत असतात. यावर्षी मोर्णा प्रकल्प ७.४ दशलक्ष घनमीटर (१६.९८टक्के), निगुर्णा प्रकल्प १७.४६ द.ल.घ.मी. (६0.५१टक्के), सध्या पारस औष्णिक वीज प्रकल्प आणि शेगाव संस्थान एकूण १२.४८ द.ल.घ.मी. शासकीय आरक्षण, तुळजापूर 0.२९७ द.ल.घ.मी. (३४.१८टक्के), गावंडगाव 0.00 (0.00टक्के), सावरगाव 0.0५४ द.ल.घ.मी. (४.७९ टक्के), पातूर तलाव 0.६६५ द.ल.घ.मी. (३५.८८टक्के), विश्‍वमित्री प्रकल्प ३.२५ द.ल.घ.मी. (३२.५१टक्के), संग्राहक तलाव झरंडी 0.४१६ द.ल.घ.मी. (२३.१६टक्के) व हिवरा तलाव 0.२३८ द.ल.घ.मी. (१0.३८ टक्के) एवढीच पाण्याची पातळी आहे.यावर्षी पातूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील हजारो शेतकर्‍यांनी खरिपातील अवर्षणप्रवणतेने हवालदिल झाल्यानंतर नव्या उमेदीने रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची संपूर्ण तयारी मोठय़ा जिकरीने पूर्ण केली होती. मात्र, सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने मोठे संकट शेतकर्‍यांवर कोसळले आहे. पातूर तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक पावसाची हजेरी असते मात्र ह्यावर्षी ४00 मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरिपाच्या हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनचे पीक हातातून गेले. उत्पादन खर्चही निघाला नाह. मात्र, शासनाने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत शेतकर्‍यांना अद्यापपयर्ंत केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून खरिपातील अवर्षणप्रवणतेने झालेल्या नुकसानाची भरपाई भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची केलेली संपूर्ण तयारी वाया गेली आहे. 

पातूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठा कमी आहे, सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी कोणत्याही प्रकल्पात नाही - अत्तरकार, शाखा अभियंता, सिंचन विभाग पातूर                             पातूर तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पावरील यावर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला आहे. त्या संदर्भातील नियोजन सभा रद्द करण्यात आली आहे. - अनिल राठोड,  उप अभियंता सिंचन शाखा अकोला 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण