शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

जिल्ह्यात ८०५ शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन एज्युकेशन सुरू कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

अकोला : कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणावर भर देताना, ...

अकोला : कोरोनामुळे सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणावर भर देताना, जिल्ह्यातील किती शाळांमध्ये इंटरनेट, वीज नाही याचा शासन विचारच करीत नाही. जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेतला असता, जिल्ह्यातील ८०५ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या शाळांमध्ये इंटरनेट नाही. विजेचे कनेक्शन नाही. त्यामुळे येथील शिक्षक, विद्यार्थ्यांना केवळ मोबाइलच्या आधारेच ऑनलाइन एज्युकेशन द्यावे लागत आहे. आरटीई कायद्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इंटरनेट, वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करायचा असेल तर शाळांमध्ये इंटरनेट हवेच. परंतु शासनाच्या शिक्षणविषयक उदासीन धोरणांमुळे अनेक शाळा विजेच्या कनेक्शनपासून, इंटरनेटपासून लांब आहेत. शाळेतील शैक्षणिक कामे, विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज, आधार लिकिंग आदींसह शाळासंबंधीच्या कामांसाठी इंटरनेटची गरज भासते. परंतु या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना बाहेरील इंटरनेट कॅफेवर जाऊन ही कामे करावी लागत आहेत. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अकोला पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या १६९ शाळांमध्ये इंटरनेटच नाही. तसेच अकोट तालुक्यातील १३५, बाळापूर तालुक्यातील ९४, बार्शीटाकळी ११२, मूर्तिजापूर तालुक्यातील ११७, पातूर तालुक्यातील ९०, तेल्हारा तालुक्यातील ८८ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर परिणाम हाेत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा १८६८

जिल्ह्यातील शासकीय शाळा ९१२

जिल्ह्यातील अनुदानित शाळा ६७४

विनाअनुदानित शाळा २८२

ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ!

आमच्या शाळेत इंटरनेटची सुविधा आहे. कॉम्प्युटर आहेत. परंतु सध्या शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मोबाइलवरूनच ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग होत आहे. बऱ्याचदा इंटरनेट, नेटवर्कच्या अडचणी येतात. शिक्षकही छान शिकवित आहेत.

- सम्यक गौतम पोहुरकर, विद्यार्थी, जि.प. शाळा, दहिगाव गावंडे

आमच्या शाळेत इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षक मोबाइलच्या माध्यमातूनच ऑनलाइन वर्ग घेतात. ऑनलाइन शिक्षण घेताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने प्राथमिक शाळा सुरू कराव्यात.

-पायल उमेश चव्हाण, विद्यार्थिनी, जि.प. शाळा, कौलखेड जहांगीर

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. विजेचे कनेक्शन नाही. त्यामुळे अडचणी येतात. शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही. अनेकदा वीजबिल थकीत असल्यामुळे जि.प. शाळांचे वीज कनेक्शन कापण्यात येते. स्मार्ट फोनच्या आधारे शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विजेचे कनेक्शनच नाही तर इंटरनेटची सुविधा कशी असणार? शाळांमध्ये इंटरनेट नसल्यामुळे शिक्षकांना स्मार्ट फोनच्या माध्यमातूनच ऑनलाइन शिक्षणाचे धडे द्यावे लागतात. काही शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा आहे. परंतु वीज कनेक्शन नसल्यामुळे त्यातही अडथळे येतात. शिक्षक आपल्या परीने ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

-नितीन बंडावार, केंद्रप्रमुख जि.प. शाळा

बहुतेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. बऱ्याच पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ते मोबाइल घेऊ शकत नाहीत. ऑनलाइन शिकवित असताना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे शक्य नाही. विद्यार्थीसुद्धा ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. पालकही आता शाळा सुरू करण्याची मागणी करीत आहेत. ॲॅण्ड्रॉइड मोबाइल आहेत. त्यांच्याकडे रिचार्ज करण्यासाठी पैसेसुद्धा नाहीत. अशा परिस्थितीत आम्हाला शिकवताना खूप अडचणी येतात.

-सुयोग खडसे, शिक्षक, सर्वोदय विद्यालय

फोटो: