शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कर्जमाफीच्या निकषांचा स्पष्ट आदेशच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:47 IST

अकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील चित्र : केवळ चार शेतक-यांना दहा हजारांची मदत

विजय शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे शासनाकडून देण्यात येणाºया तातडीच्या दहा हजार रुपये अनुदानाचा लाभ अकोट तालुक्यात केवळ चार शेतकºयांना देण्यात आला आहे.शेतकºयांना कर्जमाफी देण्यावरून सरसकट, तत्त्वत: आदी विविध प्रकारच्या घोषणा शासनाने केल्यात; परंतु स्पष्ट असा आदेश बँकांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे नेमक्या कर्जमाफीकरिता कोणते-कोणते शेतकरी पात्र ठरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोट तालुक्यात ५९ सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून अंदाजे साडेसात हजार शेतकºयांना ५४ कोटी ६२ लाख ४३ हजारांचे नवीन कर्ज वाटप करण्यात आले आहे. सन २०१४-१५ पासून असलेल्या कमीत कमी सात हजार शेतकºयांना पुनर्गठन करून देण्यात आले आहे. कर्जमाफीच्या आदेशाचा पूर्णत: निर्णय लागत नसताना शासनाने शेतकºयांना दहा हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्याची घोषणा केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून तालुक्यातील केवळ चारच शेतकºयांनी प्रत्येकी दहा हजारांचे अनुदान घेतले आहे.बँकांमार्फत अजूनही दहा हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत आहेत; परंतु दहा हजार रुपयांचे अनुदान घेतल्यास कर्जमाफी मिळणार की नाही, हे अद्याप शासनाने स्पष्ट न केल्याने शेतकरीसुद्धा या दहा हजारांच्या अनुदानाकडे पाठ फिरवित आहेत. यापूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ३० जून २०१७ पर्यंत अकोट तालुक्यातील १ हजार ३०० शेतकरी थकबाकीदार राहिले होते.या शेतकºयांनी आपल्या कर्जाचा भरणा केला नाही; परंतु निकष व कर्जमाफीची पात्रता ठरविण्याबाबतचा शासनाचा स्पष्ट आदेश बँकांपर्यंत न पोहोचल्याने बँकांनीसुद्धा याद्या लावल्या नाहीत. कर्जमाफी नेमकी कोणत्या वर्षापर्यंत दिली जाणार व कोणते शेतकरी याचे लाभार्थी ठरणार, हे स्पष्ट झाल्यानंतर अकोट तालुक्यातील १ हजार ३०० शेतकºयांच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अनेक शेतकºयांनी कर्जाचे केले पुनर्गठनअकोट तालुक्यातील ५९ सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सन २०१५-१६ च्या हंगामात १५ हजार ८७७ शेतकºयांना ८४ कोटी ८९ लाख ८ हजार पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार ९५८ शेतकºयांनी ५५ कोटी ५५ लाख ५७ हजार एवढा भरणा केला. दरम्यान, ११ हजार ९५ शेतकरी सभासदांनी अद्यापही ३ कोटी २७ लाख ८ हजार थकीत रक्कम भरली नाही, तर ५२ शेतकरी सभासदांनी २०१६-१७ मध्ये ८ लाख २४ हजार एवढी रक्कम भरली आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या आदेशानंतरच पीक कर्जमाफीचा आकडा समोर येण्याची शक्यता आहे.कर्जमाफीचा निकष व पात्रता ठरविण्याबाबत अद्याप कोणताच स्पष्ट आदेश आमच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, हे सांगता येत नाही.- एस.डी. वालसिंगे,वरिष्ठ निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती बँक अकोट.