शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

कर्जमाफीच्या निकषांचा स्पष्ट आदेशच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:47 IST

अकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील चित्र : केवळ चार शेतक-यांना दहा हजारांची मदत

विजय शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे शासनाकडून देण्यात येणाºया तातडीच्या दहा हजार रुपये अनुदानाचा लाभ अकोट तालुक्यात केवळ चार शेतकºयांना देण्यात आला आहे.शेतकºयांना कर्जमाफी देण्यावरून सरसकट, तत्त्वत: आदी विविध प्रकारच्या घोषणा शासनाने केल्यात; परंतु स्पष्ट असा आदेश बँकांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे नेमक्या कर्जमाफीकरिता कोणते-कोणते शेतकरी पात्र ठरणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोट तालुक्यात ५९ सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून अंदाजे साडेसात हजार शेतकºयांना ५४ कोटी ६२ लाख ४३ हजारांचे नवीन कर्ज वाटप करण्यात आले आहे. सन २०१४-१५ पासून असलेल्या कमीत कमी सात हजार शेतकºयांना पुनर्गठन करून देण्यात आले आहे. कर्जमाफीच्या आदेशाचा पूर्णत: निर्णय लागत नसताना शासनाने शेतकºयांना दहा हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्याची घोषणा केली होती. त्याला प्रतिसाद म्हणून तालुक्यातील केवळ चारच शेतकºयांनी प्रत्येकी दहा हजारांचे अनुदान घेतले आहे.बँकांमार्फत अजूनही दहा हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत आहेत; परंतु दहा हजार रुपयांचे अनुदान घेतल्यास कर्जमाफी मिळणार की नाही, हे अद्याप शासनाने स्पष्ट न केल्याने शेतकरीसुद्धा या दहा हजारांच्या अनुदानाकडे पाठ फिरवित आहेत. यापूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ३० जून २०१७ पर्यंत अकोट तालुक्यातील १ हजार ३०० शेतकरी थकबाकीदार राहिले होते.या शेतकºयांनी आपल्या कर्जाचा भरणा केला नाही; परंतु निकष व कर्जमाफीची पात्रता ठरविण्याबाबतचा शासनाचा स्पष्ट आदेश बँकांपर्यंत न पोहोचल्याने बँकांनीसुद्धा याद्या लावल्या नाहीत. कर्जमाफी नेमकी कोणत्या वर्षापर्यंत दिली जाणार व कोणते शेतकरी याचे लाभार्थी ठरणार, हे स्पष्ट झाल्यानंतर अकोट तालुक्यातील १ हजार ३०० शेतकºयांच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अनेक शेतकºयांनी कर्जाचे केले पुनर्गठनअकोट तालुक्यातील ५९ सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सन २०१५-१६ च्या हंगामात १५ हजार ८७७ शेतकºयांना ८४ कोटी ८९ लाख ८ हजार पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार ९५८ शेतकºयांनी ५५ कोटी ५५ लाख ५७ हजार एवढा भरणा केला. दरम्यान, ११ हजार ९५ शेतकरी सभासदांनी अद्यापही ३ कोटी २७ लाख ८ हजार थकीत रक्कम भरली नाही, तर ५२ शेतकरी सभासदांनी २०१६-१७ मध्ये ८ लाख २४ हजार एवढी रक्कम भरली आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या आदेशानंतरच पीक कर्जमाफीचा आकडा समोर येण्याची शक्यता आहे.कर्जमाफीचा निकष व पात्रता ठरविण्याबाबत अद्याप कोणताच स्पष्ट आदेश आमच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, हे सांगता येत नाही.- एस.डी. वालसिंगे,वरिष्ठ निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती बँक अकोट.