शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शासकीय सेवेत समायोजन नाहीच; ‘एनएचएम’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे स्वप्न अपुरेच!

By प्रवीण खेते | Updated: September 10, 2022 18:37 IST

त्रिसदस्यीय मंत्री समितीच्या शिफारशी शासनाने फेटाळल्या

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यासाठी तसेच विविध मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्रिसदस्यीय मंत्री समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव फेटाळत यात मांडण्यात आलेल्या बाबी तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने त्या मान्य करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. या संदर्भात गुरुवार ८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांमार्फत स्थानिक आरोग्य विभागाला कळविण्यात आले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासंदर्भात अभ्यास व शिफारशी करण्यासाठी २०१८ मध्ये शासनाने त्रिसदस्यीय मंत्री समितीचे गठण करण्यात आले होते. समितीतर्फे २८ जून २०१९ रोजी बैठक घेऊन तीन मुद्दे मांडले होते. यामध्ये शासनाच्या मेगाभरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या ३ टक्के गुण प्रती अनुभवाचे वर्ष याप्रमाणे कमाल ३० टक्के गुणाधिक्य देण्यात यावे. उमेदवारास सरळसेवा लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये अनुभवाचे गुण समाविष्ट करून निवडीसाठी गुणानुक्रम निश्चित करण्यात यावा. तसेच कर्मचाऱ्यांची कंत्राटी सेवा झाली असेल, तेवढ्या कालावधीसाठी कमाल बयोमर्यादा शिथिल करण्यात यावी. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क, गट ड आणि ग्रामविकास विभागातील रुग्णसेवेची पदे भरताना ४० टक्के पदे राखीव ठेवावीत. यासाठी सेवा प्रवेश नियमांत बदल करण्यासाठी प्रत्येक संवर्गाचा स्वतंत्र प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभाग यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेस्तव सादर करण्याचा प्रस्ताव मांडला होता. शासनाने या शिफारशी फेटाळून लावला असून, मंत्रिमंडळासमोरही सादर करण्यात येणार नसल्याचे शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यAkolaअकोलाhospitalहॉस्पिटल