शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अकोला जिल्ह्यातील दूषित पाण्याच्या विळख्यात ५७ गावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:17 IST

अकोला : ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यात हानिकारक रसायनांसोबतचे ते पाणी कमालीचे दूषित असल्याने जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांची निवड झाली; मात्र त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवण्यात येत असून, उर्वरित १५ गावांचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देजलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांची निवड झाली. २० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण यंत्रे बसवण्यात आली. सऱ्या टप्प्यात ५७ गावांमध्ये यंत्रे बसण्याला मंजुरी देण्यात आली.

अकोला : ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यात हानिकारक रसायनांसोबतचे ते पाणी कमालीचे दूषित असल्याने जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ गावांची निवड झाली; मात्र त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवण्यात येत असून, उर्वरित १५ गावांचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता खराब असलेल्या २० गावांमध्ये पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण यंत्रे बसवण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५७ गावांमध्ये यंत्रे बसण्याला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४२ गावांमध्येच यंत्रे बसवली जात आहेत. उर्वरित १५ गावांचा प्रस्ताव आता सादर केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

दूषित पाणी पुरवठ्यामुळे निवड झालेली गावेअकोला : आपोती बुद्रूक, बादलापूर, भोड, दहीगाव गावंडे, धोतर्डी, एकलारा, खांबोरा, लोणी, वैराट राजापूर, कापशी रोड. अकोट : कावसा बुद्रूक, लामकाणी, मरोडा, तरोडा. बार्शीटाकळी : मोरगाव काकड, पार्डी. मूर्तिजापूर : लाईत, हातगाव, हिवरा कोरडे, रोहणा, मुंगशी, पारद, लाखपुरी, कोळसरा, सांगवी, शेलू नजिक, टिपटाळा, दापुरा, गुंजवाडा, ताकवाडा, शिरताळा. तेल्हारा : बाभूळगाव, उबारखेड, मनब्दा, नेर, पाथर्डी, सांगवी, सिरसोली, खाकटा, वांगरगाव.

अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बंदग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी असलेली जलशुद्धीकरण संयंत्रेच बंद असल्याची माहिती पुढे आली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, टिटवा कान्हेरी सरप, एरंडा, घोटा येथे जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी येथे पंप बंद आहे. उमरी येथे अद्यापही पुरवठा सुरू झाला नाही. बोरगाव मंजू येथे थकीत देयकामुळे बंद आहे.

यंत्रे परत घेण्यासाठी बजावली होती नोटीसआठ गावांतील संयंत्रे सुरुवातीपासूनच बंद आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सर्वच ग्राम पंचायतींना अंतिम नोटीसही बजावली होती. त्यामध्ये जलशुद्धीकरण यंत्रांची गरज नसल्यास इतर गावांमध्ये बसवण्यासाठी ती परत घेण्यात येतील, याबाबत म्हणणे सादर करण्याचे बजावले होते. त्यावर अद्याप तरी कारवाई झाली नाही.

१० ते २५ पैसे लिटरने पुरवठाग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत. ग्राम पंचायतींच्या देखरेखीखाली ती चालवली जातात. त्यासाठी ग्रामस्थांकडून शुल्क घेतले जाते. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १० पैसे लिटर, तर काही गावांमध्ये १५ आणि २५ पैसे लिटरप्रमाणे शुल्क घेतले जाते.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी