शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशात संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू - नाना पटोले

By रवी दामोदर | Updated: April 18, 2023 16:43 IST

राज्यात सरकारच नव्हे, तर सर्व व्यवस्था बेजबाबदार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

अकोला : जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जी भूमिका व्यक्त केली आहे, ती अतिशय गंभीर आहे. पुलवामा घटनेत सरकारची चूक आहे, असे मलिक सांगत असताना त्यांना गप्प राहण्यास सांगितल्या गेले. गेल्या काही दिवसांपासून संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. राज्यात सरकारच नव्हे, तर सर्व व्यवस्था बेजबाबदार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

अकोल्यात मंगळवार, दि.१८ एप्रिल रोजी समाजभूषण बलदेवराव पाटील म्हैसने (गुरुवर्य) यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंड होते, तर प्रमुख उपस्थिती आमदार अमोल मिटकरी, आमदार धीरज लिंगाडे, आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरुजी, प्रकाश वाघ महाराज, सत्यपाल महाराज, गुलाब महाराज, बबनराव चौधरी, दाळू गुरुजी यांची होती. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे हे होते.

मंत्र्यांसाठी एसी, तर जनता उघड्यावर!

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी देशभरातून श्री सदस्य सकाळपासूनच मैदानात आले होते. याप्रसंगी मंत्र्यांसाठी एअर कंडीशनर होते, तर जनता राजा उघड्यावर होते. कार्यक्रम सरकारचा असल्याने सरकारने योग्य नियोजन करणे गरजेचे होते, मात्र नियोजन योग्य पद्धतीचे नसल्याने उष्माघातामुळे श्री सेवकांचा मृत्यू झाला, असे मत नाना पटोले यांनी अकोल्यातील कार्यक्रमात व्यक्त केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस