शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कर्जमाफी मिळालीच नाही; शेतकरी अन्याय निवारण कृती समितीचा ठिय्या

By रवी दामोदर | Updated: November 10, 2023 17:03 IST

शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

अकोला : राज्यात युती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु, लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित आहेत. गत सहा वर्षांपासून जिल्ह्यातील १३ हजार ३४ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामध्ये अडगाव सर्कलमधील २४८ सभासदांचा समावेश असून, त्यापैकी चार शेतकऱ्यांचा तर कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. मात्र, तरीही अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच ‘त्या’ शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परत केले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करीत युती सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोपही शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने करण्यात आला. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप बँक / संस्थेच्या वतीने कर्ज ‘नील’ असल्याचा दाखला मिळाला नसल्याने त्या शेतकऱ्यांना दुसरे कर्ज व इतर लाभ घेता येत नसल्याची स्थिती आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. हिवाळी अधिवेशनापूर्वी कर्जमाफी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुद्धा समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी शेतकरी अन्याय निवारण कृती समिती, अडगावचे अध्यक्ष अशोक राम घाटे, उपाध्यक्ष राहतखान माजितखान, सचिव अमोल मसुरकार, सदस्य गोपाल कोल्हे, रितेश देशमुख, गजानन मुंगसे, अनिल मानकर, सल्लागार मनोहरलाल फाफट, लक्ष्मीकांत कौठकर आदी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट

शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनस्थळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, गजानन गवई आदी उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी