शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी किशोर पाटील, महानगराध्यक्षपदी जयंत मसने यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब

By आशीष गावंडे | Updated: July 19, 2023 15:43 IST

राज्यात अडीच वर्षांची सत्ता उपभाेगलेल्या महाविकास आघाडीला सुरुंग लावून जून २०२२ मध्ये सत्तेत विराजमान झाल्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांची प्रदेश कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यामुळे पक्षाची धुरा नवीन जिल्हाध्यक्षाच्या खांद्यावर साेपविण्यात आली.  ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी किशोर मांगटे पाटील तसेच महानगर अध्यक्ष पदासाठी जयंत मसने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बुधवारी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश अकोल्यात धडकले. 

राज्यात अडीच वर्षांची सत्ता उपभाेगलेल्या महाविकास आघाडीला सुरुंग लावून जून २०२२ मध्ये सत्तेत विराजमान झाल्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. आगामी २०२४ मधील लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत यश संपादित करण्याच्या उद्देशातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीत फेरबदल करीत ‘ओबीसी’चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याचे समाेर आले. आगामी निवडणुकीसाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या कामगिरीवर विश्वास दाखवित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावरकर यांची पुन्हा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली. यामुळे पक्षाने सक्षम जिल्हाध्यक्षाची निवड करण्यासाठी शाेधमाेहीम सुरु केली होती.

मागील पाच वर्षाच्या कालावधीत भाजपमध्ये विविध पक्षातील अनुभवी राजकारण्यांनी प्रवेश केला. परिणामी जिल्हाध्यक्षपदासाठी नेमकी काेणाची निवड करायची, यामुद्यावर पक्षातील स्थानिक नेतृत्वासमाेर पेच निर्माण झाला होता. अखेर यावर मार्ग काढीत भाजपचे माजी महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांना प्रमोशन देत त्यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच महानगराध्यक्ष पदाची धुरा जयंत मसने यांच्याकडे देण्यात आली आहे. 

यांच्या नावाची होती चर्चा पण...

तूर्तास राज्याच्या राजकारणात भाजपच्या विराेधात इतर राजकीय पक्षांनी थाेपटलेले दंड पाहता त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटतील हे नक्की आहे. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष पदासाठी मनाेहरराव राहणे, गजानन उंबरकार, श्रीकृष्ण माेरखडे, अंबादास उमाळे, डाॅ.अमित कावरे यांची नावे चर्चेत होती. परंतु भाजपचे धक्कातंत्राचे राजकारण पाहता ऐनवेळेवर पक्षाने सर्वसमावेश चेहऱ्याची निवड केल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपा