शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 23, 2014 00:38 IST

वस्त्रोद्योग घटकांसाठी शासनाचे नवे धोरण कितपत फायदेशीर ठरणार?

राम देशपांडे / अकोला राज्य शासनाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग घटकांसाठी नुकत्याच दोन सवलती योजना जाहीर केल्या. सहकार व पणन महासंघांतर्गत सुरू असलेल्या वस्त्रोद्योग घटकांसाठी निश्‍चितच या योजना फायदेशीर ठरणार आहेत. मात्र, अखेरच्या घटका मोजून विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कायमच्या बंद पडलेल्या सूत गिरण्या व वस्त्रोद्योगांना पुन:संजीवनी देण्यासाठी शासनाचं हे नवीन धोरण कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच ठरवेल. कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण पतक्षेत्रात सहकार, पण आणि वस्त्रोद्योग विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. या विभागाकडून ग्रामीण वित्त, कृषी विपणन, औद्योगिक सहकार, बाजार नियामक आणि वित्त साहाय्य अशा विविध बाबींवर लक्ष केंद्रित केलं जातं. राज्यातील सहकार क्षेत्र, कृषिउत्पादन पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राच्या प्रशसन आणि सनियंत्रणावर वर्चस्व ठेवणार्‍या या विभागाद्वारे २४ नोव्हेंबर रोजी वस्त्रोद्योग धोरणांतर्गत दोन सवलतीच्या योजना जाहीर करण्यात आल्या. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारिकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांसाठी १0 टक्के भांडवली सवलत व केंद्र पुरस्कृत वस्त्रोद्योगांना दीर्घ मुदती कर्जावरील व्याज सवलत या दोन योजना जाहीर करण्यात आल्या.कृषी पणन संचालनालय व हातमाग, यंत्रमाग व सहकारी वस्त्रनिर्माण संचालनालयामार्फत विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातातील कृषिमालाशी निगडित राज्यातील सर्व सूत गिरण्या, हातमाग व यंत्रमाग सहकारी संस्थांना या दोन्ही सवलतींचा निश्‍चित फायदा होणार आहे. मात्र, गतकाळात राज्यात शेवटच्या घटीका मोजून बंद पडलेल्या वस्त्रोद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी या योजनांचा काहीच उपयोग होणार नसल्याचे मत अकोल्यातील प्रेदेश इंटक सचिव तसेच केंद्रीय इंटकचे विशेष आमंत्रित सदस्य प्रदीप वखारिया यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले. एकेकाळी कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले खामगाव शहराची ख्याती केव्हाच लोप पावली आहे. कापसाच्या निर्यातीसाठी इंग्रजांनी खामगाव ते जलंब दरम्यान टाकलेला रेल्वे मार्ग आता नुसता नावालाच उरला आहे.