शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शहरात १,३८७ जणांची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST

आगग्रस्त दुकानांची पाहणी अकाेला: जुना भाजी बाजार, चुडा बाजारातील चार दुकानांना मंगळवारी आग लागल्याची घटना घडली. यावेळी भाजपचे आमदार ...

आगग्रस्त दुकानांची पाहणी

अकाेला: जुना भाजी बाजार, चुडा बाजारातील चार दुकानांना मंगळवारी आग लागल्याची घटना घडली. यावेळी भाजपचे आमदार गाेवर्धन शर्मा यांनी आगग्रस्त दुकानांची पाहणी करून झालेल्या नुकसान भरपाईची माहिती घेतली. यावेळी सभापती संजय बडोणे, नगरसेवक अजय शर्मा, हिरालाल कृपलानी, विनोद मनवाणी, दीप मनवानी, अतुल शर्मा, मनीष बाछुका आदी उपस्थित हाेते.

जि.प.मध्ये अधिकाऱ्यांची वानवा !

अकाेला: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना संबंधित अधिकारी जागेवर सापडत नसल्याचे चित्र समाेर आले आहे. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे प्रलंबित विषय कायम राहत आहेत. दालनातील पदाधिकारीही याेग्यरीत्या समाधान करीत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्हा कचेरीत पार्किंगला खाे!

अकाेला: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु पार्किंगचा कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराकडूनच नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या परिसरात वाहने ठेवताना शिस्तीचे पालन हाेत नसल्याचे चित्र आहे.

महामार्गाची दुरुस्ती रखडली!

अकाेला : शिवनी ते नेहरू पार्क चाैक ते खदान पाेलीस ठाणे ते बाबासाहेब धाबेकर फार्महाउसपर्यंत निर्माणाधीन मिनी हायवेच्या कामाची गती मंदावली आहे. सिमेंट रस्त्याचे रुंदीकरण हाेत असताना, वाशिम बायपास चाैक,गुरांचा बाजार, मानव शाेरूम, तसेच निमवाडी चाैकात रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जलवाहिनीची दुरुस्ती

अकाेला: जुने शहरातील डाबकी राेड भागात कामगार कल्याण मंडळ कार्यालयाजवळ पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याचे समाेर आले हाेते. या ठिकाणी सातत्याने जलवाहिनीला गळती लागत असल्याचे दिसून येते. मनपाच्या वतीने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.

शहरात डासांची पैदास

अकाेला : शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, प्रभागांमध्ये धुरळणी, फवारणी करण्याची जबाबदारी असलेला महापालिकेचा हिवताप विभाग गाढ झाेपेत असल्याचे समाेर आले आहे. या विभागाकडून नेमक्या काेणत्या प्रभागात फवारणी केली जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाजारपेठेत नियम पायदळी

अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही लग्नसराईमुळे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. यावेळी दुकानांमध्ये काेणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र असून, यामुळेच काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाने केले आहे.