शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शहरात १,३८७ जणांची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST

आगग्रस्त दुकानांची पाहणी अकाेला: जुना भाजी बाजार, चुडा बाजारातील चार दुकानांना मंगळवारी आग लागल्याची घटना घडली. यावेळी भाजपचे आमदार ...

आगग्रस्त दुकानांची पाहणी

अकाेला: जुना भाजी बाजार, चुडा बाजारातील चार दुकानांना मंगळवारी आग लागल्याची घटना घडली. यावेळी भाजपचे आमदार गाेवर्धन शर्मा यांनी आगग्रस्त दुकानांची पाहणी करून झालेल्या नुकसान भरपाईची माहिती घेतली. यावेळी सभापती संजय बडोणे, नगरसेवक अजय शर्मा, हिरालाल कृपलानी, विनोद मनवाणी, दीप मनवानी, अतुल शर्मा, मनीष बाछुका आदी उपस्थित हाेते.

जि.प.मध्ये अधिकाऱ्यांची वानवा !

अकाेला: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना संबंधित अधिकारी जागेवर सापडत नसल्याचे चित्र समाेर आले आहे. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे प्रलंबित विषय कायम राहत आहेत. दालनातील पदाधिकारीही याेग्यरीत्या समाधान करीत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्हा कचेरीत पार्किंगला खाे!

अकाेला: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु पार्किंगचा कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराकडूनच नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या परिसरात वाहने ठेवताना शिस्तीचे पालन हाेत नसल्याचे चित्र आहे.

महामार्गाची दुरुस्ती रखडली!

अकाेला : शिवनी ते नेहरू पार्क चाैक ते खदान पाेलीस ठाणे ते बाबासाहेब धाबेकर फार्महाउसपर्यंत निर्माणाधीन मिनी हायवेच्या कामाची गती मंदावली आहे. सिमेंट रस्त्याचे रुंदीकरण हाेत असताना, वाशिम बायपास चाैक,गुरांचा बाजार, मानव शाेरूम, तसेच निमवाडी चाैकात रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जलवाहिनीची दुरुस्ती

अकाेला: जुने शहरातील डाबकी राेड भागात कामगार कल्याण मंडळ कार्यालयाजवळ पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याचे समाेर आले हाेते. या ठिकाणी सातत्याने जलवाहिनीला गळती लागत असल्याचे दिसून येते. मनपाच्या वतीने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.

शहरात डासांची पैदास

अकाेला : शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, प्रभागांमध्ये धुरळणी, फवारणी करण्याची जबाबदारी असलेला महापालिकेचा हिवताप विभाग गाढ झाेपेत असल्याचे समाेर आले आहे. या विभागाकडून नेमक्या काेणत्या प्रभागात फवारणी केली जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाजारपेठेत नियम पायदळी

अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही लग्नसराईमुळे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. यावेळी दुकानांमध्ये काेणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र असून, यामुळेच काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाने केले आहे.