शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

फ्लेक्स लावण्यावरून तणाव; पांढुर्णा गावात दोन गट आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:27 IST

आलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्दे पोलिसांमुळे टळला अनर्थ 

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवारीही गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. दुपारी शांतता समितीची बैठक घेऊन हा वाद सामोपचाराने सोडविण्यात आला आणि ग्रामपंचायतमध्ये रीतसर ठराव घेऊनच गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स किंवा झेंडे लावायचे याचा निर्णय घेण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. पांढुर्णा गावातही ग्रामपंचायतच्या राजकारणावरून दोन गट पडले आहेत. त्यापैकी एका गटाने रविवारी रात्री गावाच्या प्रवेशद्वारावर महापुरुषाचे फ्लेक्स लावले; मात्र दुसर्‍या गटातील युवकाने त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून वाद सुरू झाला. या प्रवेशद्वारावर गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट समाजाचे झेंडे लावण्यात आले आहेत. आता त्याच प्रवेशद्वारावर दुसर्‍या गटाने महापुरुषाचे फ्लेक्स लावले. त्याला विरोध झाल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. रात्रीच्या सुमारास आदिवासी, हटकर आणि दुसर्‍या समाजातील लोक लाठय़ा- काठय़ा आणि शस्त्रे घेऊन आमने-सामने आले. याची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार गजानन खारडे यांच्या नेतृत्वातील पथकाने गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. समयसूचकता दाखवून ठाणेदार गजानन खारडे आणि त्यांचे पोलीस पथक गावात पोहोचल्याने दंगलसदृश निर्माण झालेली परिस्थिती निवळली. सोमवारीही या प्रकरणावरून तणावाची परिस्थिती कायम होती. पातूरचे तहसीलदार रामेश्‍वर पुरी, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पातूरचे ठाणेदार खंडेराव, ग्रामसेवक योगेश कापकर, सामाजिक कार्यकर्ते, भारिप-बमसंचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांनी पांढुर्णा गावात सभा घेऊन प्रकरण सामोपचाराने मिटविले. यावेळी प्रवेशद्वारावर फ्लेक्स किंवा झेंडे जे काही लावायचे असेल, त्यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये रीतसर ठराव घेऊन निर्णय घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (वार्ताहर)

बाळापूरमध्ये झेंडा लावण्यावरून तणावबाळापूर : शहरात नगर परिषदेच्यावतीने लावण्यात आलेल्या विजेच्या खांबावर विविध धर्मियांनी आपापले झेंडे लावले होते. त्यामुळे सोमवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सर्वच झेंडे काढल्याने तणाव निवळला. बाळापूर शहरात नगरपालिकेच्यावतीने विजेच्या खांब्यावर विविध ठिकाणी वेगवेगळ्य़ा धर्माचे झेंडे काही युवकांनी लावले होते. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी बाळापूर पोलिसांच्या सहकार्याने शहरात लावलेले सर्वच झेंडे काढून टाकल्याने तणाव निवळल्या गेला. 

टॅग्स :BalapurबाळापूरAkola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हा