शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

फ्लेक्स लावण्यावरून तणाव; पांढुर्णा गावात दोन गट आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:27 IST

आलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्दे पोलिसांमुळे टळला अनर्थ 

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवारीही गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. दुपारी शांतता समितीची बैठक घेऊन हा वाद सामोपचाराने सोडविण्यात आला आणि ग्रामपंचायतमध्ये रीतसर ठराव घेऊनच गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स किंवा झेंडे लावायचे याचा निर्णय घेण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. पांढुर्णा गावातही ग्रामपंचायतच्या राजकारणावरून दोन गट पडले आहेत. त्यापैकी एका गटाने रविवारी रात्री गावाच्या प्रवेशद्वारावर महापुरुषाचे फ्लेक्स लावले; मात्र दुसर्‍या गटातील युवकाने त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून वाद सुरू झाला. या प्रवेशद्वारावर गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट समाजाचे झेंडे लावण्यात आले आहेत. आता त्याच प्रवेशद्वारावर दुसर्‍या गटाने महापुरुषाचे फ्लेक्स लावले. त्याला विरोध झाल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. रात्रीच्या सुमारास आदिवासी, हटकर आणि दुसर्‍या समाजातील लोक लाठय़ा- काठय़ा आणि शस्त्रे घेऊन आमने-सामने आले. याची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार गजानन खारडे यांच्या नेतृत्वातील पथकाने गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. समयसूचकता दाखवून ठाणेदार गजानन खारडे आणि त्यांचे पोलीस पथक गावात पोहोचल्याने दंगलसदृश निर्माण झालेली परिस्थिती निवळली. सोमवारीही या प्रकरणावरून तणावाची परिस्थिती कायम होती. पातूरचे तहसीलदार रामेश्‍वर पुरी, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पातूरचे ठाणेदार खंडेराव, ग्रामसेवक योगेश कापकर, सामाजिक कार्यकर्ते, भारिप-बमसंचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांनी पांढुर्णा गावात सभा घेऊन प्रकरण सामोपचाराने मिटविले. यावेळी प्रवेशद्वारावर फ्लेक्स किंवा झेंडे जे काही लावायचे असेल, त्यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये रीतसर ठराव घेऊन निर्णय घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (वार्ताहर)

बाळापूरमध्ये झेंडा लावण्यावरून तणावबाळापूर : शहरात नगर परिषदेच्यावतीने लावण्यात आलेल्या विजेच्या खांबावर विविध धर्मियांनी आपापले झेंडे लावले होते. त्यामुळे सोमवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सर्वच झेंडे काढल्याने तणाव निवळला. बाळापूर शहरात नगरपालिकेच्यावतीने विजेच्या खांब्यावर विविध ठिकाणी वेगवेगळ्य़ा धर्माचे झेंडे काही युवकांनी लावले होते. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी बाळापूर पोलिसांच्या सहकार्याने शहरात लावलेले सर्वच झेंडे काढून टाकल्याने तणाव निवळल्या गेला. 

टॅग्स :BalapurबाळापूरAkola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हा