शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 23:15 IST

अ‍ॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते.

- राजेश शेगोकार

अकोला : अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराच्या कावड यात्रेच्या निमित्ताने मंदिर खुले करून यात्रेची परंपरा कायम ठेवा या मागणीकरिता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांपूर्वी थेट मंदिरात प्रवेश करून हिंदुत्ववादी मतांचे राजकारण करणाऱ्यांना धक्का दिला होता. याच मंदिर प्रवेशाचा दुसरा अंक सोमवारी पंढरपुरात पार पडला. २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले राजराजेश्वराचे मंदिर ज्याप्रमाणे अ‍ॅड. आंबेडकरांसाठी खुले झाले तोच कित्ता पंढरपुरात घडला. अ‍ॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते.सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. गेल्या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने दलितेतर मतांकडे लक्ष केंद्रित केले. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४२ लाख तसेच विधानसभा निवडणुकीत २९ लाख मते घेऊन त्यांच्या पक्षाने राज्यातील अनेक मतदारसंघातील समीकरणे बदलविली. आता लॉकडाऊनच्या निमित्ताने त्यांनी नव्या संधीचा शोध घेतला. ज्या मुद्यांवर लोकांमध्ये रोष आहे, त्या मुद्यांना हात घातला. एसटीसाठी डफली वाजवली, हातावर पोट असलेल्या बारा-बलुतेदारांसाठी आंदोलनाची हाक दिली. या सर्व आंदोलनात मास्टरस्ट्रोक ठरले मंदिर प्रवेशाचे आंदोलन. त्यांच्या राजकीय कर्मभूमीतील राजराजेश्वराच्या कावड यात्रेला ७६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा. प्रशासनाने कोरोनाचे कारण देत यात्रेला परवानगी नाकारली होती. या मुद्यावर त्यांनी थेट मंदिर उघडून दर्शन घेत लक्ष वेधले होते.अ‍ॅड. आंबेडकरांसाठी बंद असलेले मंदिर उघडू शकते हे लक्षात आल्यावर पंढरपूरचे मंदिर खुले करण्यासाठी चळवळ उभारणाºया सर्व वारकऱ्यांना हुरूप आला आणि मंदिर प्रवेश आंदोलनाला व्यापकता आली. यामध्ये थेट आंबेडकरांनी उडी घेतल्याने या आंदोलनाचे राजकीयकरण झालेच. ज्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. आंबेडकरांनी निवडणूक लढविली त्याचा पंढरपुरातील मंदिराचा प्रश्न असल्याने साहजिकच त्यांची नैतिक जबाबदारीही होतीच; मात्र या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राजकारण अधिक व्यापक करण्याची संधी त्यांनी साधली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून पक्षाची प्रतिमा उंचावण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. योगायोग म्हणजे एसटी सुरू करण्यासाठी आंबेडकरांनी डफली वाजवली व एसटी सुरू करण्याचा निर्णय झाला. नाभिक समाजाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी यासाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली अन् अटी, शर्तीवर त्यांना परवानगी मिळाली. आता पंढरपुरातील आंदोलनानंतर थेट मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करून आठ दिवसात निर्णय होण्याचे आश्वासन मिळाल्याने अ‍ॅड. आंबेडरकरांना महाआघाडी शासन भाजपपेक्षाही अधिक गांभीर्याने घेते हे सुद्धा अधोरेखित झाले आहे.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाPoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी