शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 23:15 IST

अ‍ॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते.

- राजेश शेगोकार

अकोला : अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराच्या कावड यात्रेच्या निमित्ताने मंदिर खुले करून यात्रेची परंपरा कायम ठेवा या मागणीकरिता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांपूर्वी थेट मंदिरात प्रवेश करून हिंदुत्ववादी मतांचे राजकारण करणाऱ्यांना धक्का दिला होता. याच मंदिर प्रवेशाचा दुसरा अंक सोमवारी पंढरपुरात पार पडला. २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेले राजराजेश्वराचे मंदिर ज्याप्रमाणे अ‍ॅड. आंबेडकरांसाठी खुले झाले तोच कित्ता पंढरपुरात घडला. अ‍ॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते.सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. गेल्या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने दलितेतर मतांकडे लक्ष केंद्रित केले. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४२ लाख तसेच विधानसभा निवडणुकीत २९ लाख मते घेऊन त्यांच्या पक्षाने राज्यातील अनेक मतदारसंघातील समीकरणे बदलविली. आता लॉकडाऊनच्या निमित्ताने त्यांनी नव्या संधीचा शोध घेतला. ज्या मुद्यांवर लोकांमध्ये रोष आहे, त्या मुद्यांना हात घातला. एसटीसाठी डफली वाजवली, हातावर पोट असलेल्या बारा-बलुतेदारांसाठी आंदोलनाची हाक दिली. या सर्व आंदोलनात मास्टरस्ट्रोक ठरले मंदिर प्रवेशाचे आंदोलन. त्यांच्या राजकीय कर्मभूमीतील राजराजेश्वराच्या कावड यात्रेला ७६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा. प्रशासनाने कोरोनाचे कारण देत यात्रेला परवानगी नाकारली होती. या मुद्यावर त्यांनी थेट मंदिर उघडून दर्शन घेत लक्ष वेधले होते.अ‍ॅड. आंबेडकरांसाठी बंद असलेले मंदिर उघडू शकते हे लक्षात आल्यावर पंढरपूरचे मंदिर खुले करण्यासाठी चळवळ उभारणाºया सर्व वारकऱ्यांना हुरूप आला आणि मंदिर प्रवेश आंदोलनाला व्यापकता आली. यामध्ये थेट आंबेडकरांनी उडी घेतल्याने या आंदोलनाचे राजकीयकरण झालेच. ज्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. आंबेडकरांनी निवडणूक लढविली त्याचा पंढरपुरातील मंदिराचा प्रश्न असल्याने साहजिकच त्यांची नैतिक जबाबदारीही होतीच; मात्र या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राजकारण अधिक व्यापक करण्याची संधी त्यांनी साधली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून पक्षाची प्रतिमा उंचावण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. योगायोग म्हणजे एसटी सुरू करण्यासाठी आंबेडकरांनी डफली वाजवली व एसटी सुरू करण्याचा निर्णय झाला. नाभिक समाजाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी यासाठी त्यांनी आंदोलनाची हाक दिली अन् अटी, शर्तीवर त्यांना परवानगी मिळाली. आता पंढरपुरातील आंदोलनानंतर थेट मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करून आठ दिवसात निर्णय होण्याचे आश्वासन मिळाल्याने अ‍ॅड. आंबेडरकरांना महाआघाडी शासन भाजपपेक्षाही अधिक गांभीर्याने घेते हे सुद्धा अधोरेखित झाले आहे.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाPoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी