शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

वऱ्हाडात गारठा वाढला; सरासरी ५ अंशाने किमान तापमान घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:39 IST

अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील किमान तापमानात सारखा चढ-उतार सुरू आहे.

अकोला: पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात किमान तापमान सरासरी ५ अंशाने घटले असून, वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. विदर्भात येत्या १, २ व ४ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गत पंधरवड्यात हे किमान तापमान १६ अंश होते.वऱ्हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील किमान तापमानात सारखा चढ-उतार सुरू आहे. डिसेंबर महिन्यात एक-दोन दिवस सोडले, तर अद्याप अपेक्षित थंडी पडली नाही. डिसेंबर २०१९ मध्ये २८ व २९ डिसेंबर रोजी सरासरी किमान तापमान ७ अंश होते. त्यानंतर १० आणि ११ जानेवारीला ९.७ आणि ८.४ पर्यंत हे किमान तापमान कमी झाले. या हिवाळा ऋतूमध्ये केवळ चार दिवस थंडी पडली. तेव्हापासून ३० जानेवारीपर्यंत किमान तापमान सरासरी १६ होते. आता अचानक वातावरणात गारठा वाढला असून, किमान तापमान घटून सरासरी ११ अंशापर्यंत खाली आहे. हा गारठा जो आहे, तो हवेच्या वेगामुळे वाढला आहे. देशाच्या उत्तर-पूर्व भागात बर्फवृष्टी होत आहे. त्या भागाकडून महाराष्टÑाकडे हे वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली असल्याचे हवामानशास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे.गत चोवीस तासांत शुक्रवार, सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अकोला जिल्ह्यात हेच किमान तापमान ११.२ होते. अमरावती ११.२, बुलडाणा ११.६, चंद्रपूर १२.६, नागपूर १२.२, वर्धा १२.०, यवतमाळ १३.० तसेच वाशिमचे किमान तापमान १२.० होते.दरम्यान, १ ते ४ फेब्रुवारीपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या वातावरणाचा मात्र पिकावर प्र्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाweatherहवामानAmravatiअमरावतीbuldhanaबुलडाणा