शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

तेल्हारा तालुका कृषी विभागाकडे बोंडअळीग्रस्त १५00 शेतकर्‍यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 20:40 IST

तेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

ठळक मुद्देतक्रारींचा ओघा सुरुचा; अर्ज देण्यासाठी लागल्या शेतकर्‍यांच्या रांगाकृषी विभागाचे अधिकारी करताहेत तक्रारकर्त्यांच्या शेतात जाऊन पंचनामे 

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.तेल्हारा तालुका हा विदर्भात कापूस पट्टा म्हणून ओळखल्या जातो. तालुक्यात जलसिंचन असल्याने यावर्षी २२ हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली. त्यात शेतकर्‍यांनी या पिकावर एकरी २0 ते २२ हजार रुपये खर्च केला व मे महिन्यात भरउन्हात पाणी देऊन कपाशी जगवली; मात्र काही महिन्यांपासून कपाशीवर गुलाबी बोंडअळी आल्याने एकरी १२ ते १५ क्विंटल होणारे उत्पादन केवळ २ ते ४ क्विंटल प्रतिएकर झाले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घटून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी बिटी बियाणे बोगस असल्याची तालुक्यातील १५00 शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारींचा ओघ मोठय़ा प्रमाणात चालू आहे. तक्रारी करणार्‍या शेतकर्‍यांच्या मोठय़ा रांगाच लागल्या आहेत. तक्रारी मिळाल्यानंतर कृषी विभाग शेतात जाऊन पंचनामे करीत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत ७00 शेतकर्‍यांचे पंचनामे केले आहेत. शासनाने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना सर्व्हे करून त्वरित मदत करावी, अशी मागणी होत आहे. उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने शेतकर्‍यांचे मनोबल पूर्ण खचले. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :Telharaतेल्हाराFarmerशेतकरी