शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तेल्हारा तालुका कृषी विभागाकडे बोंडअळीग्रस्त १५00 शेतकर्‍यांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 20:40 IST

तेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.

ठळक मुद्देतक्रारींचा ओघा सुरुचा; अर्ज देण्यासाठी लागल्या शेतकर्‍यांच्या रांगाकृषी विभागाचे अधिकारी करताहेत तक्रारकर्त्यांच्या शेतात जाऊन पंचनामे 

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.तेल्हारा तालुका हा विदर्भात कापूस पट्टा म्हणून ओळखल्या जातो. तालुक्यात जलसिंचन असल्याने यावर्षी २२ हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी कपाशीची लागवड केली. त्यात शेतकर्‍यांनी या पिकावर एकरी २0 ते २२ हजार रुपये खर्च केला व मे महिन्यात भरउन्हात पाणी देऊन कपाशी जगवली; मात्र काही महिन्यांपासून कपाशीवर गुलाबी बोंडअळी आल्याने एकरी १२ ते १५ क्विंटल होणारे उत्पादन केवळ २ ते ४ क्विंटल प्रतिएकर झाले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घटून शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी बिटी बियाणे बोगस असल्याची तालुक्यातील १५00 शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारींचा ओघ मोठय़ा प्रमाणात चालू आहे. तक्रारी करणार्‍या शेतकर्‍यांच्या मोठय़ा रांगाच लागल्या आहेत. तक्रारी मिळाल्यानंतर कृषी विभाग शेतात जाऊन पंचनामे करीत आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत ७00 शेतकर्‍यांचे पंचनामे केले आहेत. शासनाने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना सर्व्हे करून त्वरित मदत करावी, अशी मागणी होत आहे. उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने शेतकर्‍यांचे मनोबल पूर्ण खचले. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :Telharaतेल्हाराFarmerशेतकरी