शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पावसाळ्यातही विदर्भ, मराठवाड्यात टँकर कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 10:32 IST

Water Scarcity : विदर्भ, मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे टँकर कायम आहे.

अकोला : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन १२ दिवस झाले आहे; परंतु पश्चिम महाराष्ट्र, कोकणचा भाग सोडता उर्वरित भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे टँकर कायम आहे. सद्य:स्थितीत राज्यात ३५४ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्यावर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. परिणामी, चालू वर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात जाणवल्या. १४ जूनपर्यंत प्राप्त माहितीत सद्य:स्थितीत राज्यात ३५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पावसाचे आगमन झाल्याने राज्यात टँकरची संख्या घटली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात टँकरची संख्या निम्म्यावर आली; परंतु विदर्भ व मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने येथे टँकरची संख्या कायम आहे. विदर्भात ११३ तर मराठवाड्यात ८१ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. या भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टँकरव्दारे पाणीपुरवठा

विदर्भ ११३

मराठवाडा ८१

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात टँकर घटले!

राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी टँकरची संख्या घटली आहे. १४ जूनपर्यंत प्राप्त अहवालात कोकण ५१, नाशिक ७५, पुणे विभागात ३४ टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे.

 

मागील वर्षीपेक्षा यंदा टँकर कमी

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा राज्यात टँकरची संख्या कमी आहे. मागील वर्षी याच वेळेला ७९९ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई