शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वऱ्हाडात टॅँकरची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:34 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात १०० हून अधिक टॅँकर सुरू करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात ९ ट्रक पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात लघू, मध्यम व मोठे मिळून ५०२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ १८ टक्केच साठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यातील एक मोठा व तीन मध्यम प्रकल्पातील साठा संपला असून, पेणटाकळीत ०.७३ तर तोरणा प्रकल्पात १.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील घुंगशी धरणाचा साठा शून्य असून, निर्गुणा प्रकल्पात केवळ ३.०५ टक्के साठा उपलब्ध आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पाचा साठा ०.८९ टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणातही केवळ ९.९७ टक्केच साठा असून, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १०.३७, पलढग १३.५८,मन १८.११, तर उतावळी प्रकल्पात २४.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात २०.४७,वान ४०.७७, मोर्णा १५.८५, उमा प्रकल्पात ६.३४ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १७.३२, एकबुर्जीमध्ये २१.७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ २० टक्के साठा असून, यवतमाळच्या पूस प्रकल्पात ३३.३२, अरुणावती १९.९३, बेबळामध्ये २३.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.पाच जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्याने या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा संचयित झाला होता. इतर चारही जिल्ह्याची स्थिती नाजूक आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई