शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात टॅँकरची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:34 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात १०० हून अधिक टॅँकर सुरू करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात ९ ट्रक पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात लघू, मध्यम व मोठे मिळून ५०२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ १८ टक्केच साठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यातील एक मोठा व तीन मध्यम प्रकल्पातील साठा संपला असून, पेणटाकळीत ०.७३ तर तोरणा प्रकल्पात १.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील घुंगशी धरणाचा साठा शून्य असून, निर्गुणा प्रकल्पात केवळ ३.०५ टक्के साठा उपलब्ध आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पाचा साठा ०.८९ टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणातही केवळ ९.९७ टक्केच साठा असून, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १०.३७, पलढग १३.५८,मन १८.११, तर उतावळी प्रकल्पात २४.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात २०.४७,वान ४०.७७, मोर्णा १५.८५, उमा प्रकल्पात ६.३४ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १७.३२, एकबुर्जीमध्ये २१.७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ २० टक्के साठा असून, यवतमाळच्या पूस प्रकल्पात ३३.३२, अरुणावती १९.९३, बेबळामध्ये २३.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.पाच जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्याने या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा संचयित झाला होता. इतर चारही जिल्ह्याची स्थिती नाजूक आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई