शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वऱ्हाडात टॅँकरची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:34 IST

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात १०० हून अधिक टॅँकर सुरू करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात ९ ट्रक पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात लघू, मध्यम व मोठे मिळून ५०२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ १८ टक्केच साठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यातील एक मोठा व तीन मध्यम प्रकल्पातील साठा संपला असून, पेणटाकळीत ०.७३ तर तोरणा प्रकल्पात १.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील घुंगशी धरणाचा साठा शून्य असून, निर्गुणा प्रकल्पात केवळ ३.०५ टक्के साठा उपलब्ध आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पाचा साठा ०.८९ टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणातही केवळ ९.९७ टक्केच साठा असून, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १०.३७, पलढग १३.५८,मन १८.११, तर उतावळी प्रकल्पात २४.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात २०.४७,वान ४०.७७, मोर्णा १५.८५, उमा प्रकल्पात ६.३४ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १७.३२, एकबुर्जीमध्ये २१.७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ २० टक्के साठा असून, यवतमाळच्या पूस प्रकल्पात ३३.३२, अरुणावती १९.९३, बेबळामध्ये २३.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.पाच जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्याने या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा संचयित झाला होता. इतर चारही जिल्ह्याची स्थिती नाजूक आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई