शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

तलाठी, मंडळ अधिका-यांना आता १२७५ रुपये प्रवासभत्ता

By admin | Updated: November 24, 2014 00:09 IST

महसुल विभागातील संवर्गामध्ये समाधान

संतोष मुंढे/वाशिम

         राज्यभरातील साझे व महसुल मंडळात कार्यरत तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना दरमहा १२७५ रुपये प्रवासभत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बर्‍याच वर्षापासून या दोन्ही संवर्गाच्या मागणीबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने या दोन्ही महसुल विभागातील संवर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे. एक, दोन किंवा अपवादात्मक स्थितीत तीन पेक्षा जास्त गावांचा समावेश असलेल्या साझाची जबाबदारी सांभाळणारा तलाठी. तर किमान सहा साझांचे मिळून बनलेल्या एका महसुली मंडळाचा प्रमुख म्हणजे मंडळ अधिकारी. महसुली विभागाच्या क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या अधिकारी कर्मचार्‍यावर आपल्या विभागासह इतरही विभागाशी संबधीत योजनांची अंमलबाजावणी करण्याची जबाबदारी ठरलेली. या जबाबदारीच्या अनुषंगाने संबंधीत अधिकारी कर्मचार्‍यांना आपल्या अख्त्यारितील गावांमध्ये फिरावे लागते. अनेकदा कामानिमीत्ताने तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे त्यांना क्रमप्राप्त असते. होणार्‍या प्रवास खर्चाची देयके सादर करताना संबधीत अधिकारी व कर्मचारी वर्गाची चांगलीच दमछाक होत होती. अनेकदा त्यांना प्रवास भत्ता देयके सादर करणेही शक्य होत नाही. सोबतच प्रवासावर खर्च होणार्‍या रक्कमची प्रतिपूर्ती मिळण्यास बराच कालावधी लागत होता. त्यामुळे शासनाच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना असणार्‍या प्रवासभत्ता देय असणार्‍या सोयीप्रमाणे दरमहा वेतनात दैनिक भत्त्यासह कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी विदर्भ पटवारी संघ व मंडळ अधिकारी संघटनेच्यावतीने शासनाकडे बर्‍याच वर्षापासून लावून धरण्यात आली होती. यामध्ये तलाठी संवर्गाला दरमहा २ हजार रुपये तर मंडळ अधिकार्‍याला किमान ३ हजार रुपये दरमहा प्रवासभता देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर निर्णय घेत राज्य शासनाने २१ नोव्हेंबर २0१४ रोजी राज्यभरातील तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना दरमहा १२७५ रुपये प्रवास भत्ता दैनिक भत्त्यासह मंजूर केला आहे. हा भत्ता तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना १ सप्टेबर २0१४ पासून अनुट्ठोय राहणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी येणार्‍या अतिरिक्त खर्चास प्रत्यक्ष विधी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर व त्यासंबंधीची तरतूद झाल्यानंतरच निधी वितरीत करण्यात येणार असल्याचे शासनाच्यावतीने उपसचीव डॉ. माधव वीर यांच्या स्वाक्षरीनिशी काढलेल्या अध्यादेशातून स्पष्ट केले.