शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

विषमुक्त फळे, भाजीपाला उत्पादनाचा घेतला ध्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 14:20 IST

सेंद्रीय शेती उत्पादनाचा त्याचा हा प्रकल्प इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विषमुक्त अन्न, भाजीपाला उत्पादनासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु महिला शेतकरी वंदना धोत्रे गत ९ वर्षापासून प्रत्यक्ष सेंद्रिय फळे, भाजीपाला उत्पादन घेत असून, अकोलेकरांना हा भाजीपाला उपलब्धही करू न देत आहेत. सेंद्रीय शेती उत्पादनाचा त्याचा हा प्रकल्प इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.पातूर तालुक्यातील विवराच्या महिला शेतकरी वंदना धोत्रे यांच्याकडे ४ एकर शेती आहे.हेच त्यांच्या उपजिवीकेचे साधन आहे.रासायनिक शेतीचा धोका वाढल्याने यावर उपाय म्हणून त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा ध्यास घेतला. याकरिता त्यांनी सुरुवातीला सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला.यातूनच त्यांनी २०११ पासून बायोडायनामिक सेंद्रिय शेती करण्यात सुरुवात केली. २०१४ पासून त्या प्रमाणित सेंद्रिय शेती करीत आहेत. अर्थात यासाठी त्यांना त्यांचे पती देवीदास धोत्रे यांची मोठी साथ आहे. सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासह त्या बुनियाद केंद्र चालवतात. तद्वतच बायोडायनामिक सेंद्रिय शेती कशी करावी, यासाठीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करीत आहेत.चार एकरावर सेंद्रिय शेती करणे याला धाडसच हवे; परंतु त्या ज्या पद्धतीने सेंद्रिय शेती करतात हा एक आदर्शच आहे. त्यांच्या शेतात सर्व प्रकारच्या भाज्या तसेच फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्या शेतात निर्मित भाजीपाला आठवड्यातील तीन दिवस अकोल्यातील गोरक्षण रोडवर विक ण्यात येतो. सुरुवातीला यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले. आजमितीस त्या दररोज १ हजार रुपये निव्वळ नफा मिळवित असून, शेती उत्पादनावरच त्यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा सेंद्रिय शेती करण्याचा लौकिक सर्वत्र पसरला असून, सेंद्रिय शेती बघण्यासाठी केंद्रीय सहसचिव राणी कुमोदिनी, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी भेट दिली. आतापर्यंत ३ हजारांवर शेतकरी शेती बघून गेले. अकोला कृषी विज्ञान केंद्राने त्यांचा गौरव केला आहे. यासाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

नागरिकांना विषमुक्त फळे, भाजीपाला नियमित मिळावीत म्हणून माझे पती आणि मी सेंद्रिय शेती करीत आहे. आम्ही दोघे प्रमाणित सेंद्रिय भाजीपाला व फळे विक्री करतोय.-वंदना धोत्रे,विवरा.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी