शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

पाणीटंचाई निवारणाचे आराखडे सादर करण्यात उदासीनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:24 IST

पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे सादर करण्याच्या कामात संबंधित यंत्रणांची उदासीनता समोर येत आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे सादर करण्याचे गत महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले; मात्र सहा तालुक्यांतील कृती आराखडे अद्याप सादर करण्यात आले नसल्याने, जानेवारी ते जून या कालावधीचा जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे सादर करण्याच्या कामात संबंधित यंत्रणांची उदासीनता समोर येत आहे. त्यानुषंगाने अपर जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह (सीईओ) संबंधित यंत्रणांना पत्र देत कृती आराखडे सादर करण्याचे निर्देश १९ नोव्हेंबर रोजी दिले.जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत १५ आणि १७ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसह तहसीलदार आणि गटविकास अधिकाºयांना देण्यात आले; परंतु तेल्हारा तालुका वगळता जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाºयांच्या संयुक्त स्वाक्षरीचे पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे अद्याप जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जानेवारी ते जून या कालावधीसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे सादर करण्याच्या कामात संबंधित यंत्रणेची उदासीनता समोर येत आहे. या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह संबंधित यंत्रणांना पत्राद्वारे दिले.दोन टप्प्यातील असे प्रलंबित आहेत आराखडे!जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या दोन टप्प्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाला; मात्र अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांतील पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे अद्याप प्रलंबित आहेत.विभागीय आयुक्तांनी दिले निर्देश!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. यासंदर्भात दखल घेत पाणीटंचाई निवारणाचे आराखडे तातडीने प्राप्त करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांनी २० नोव्हेंबर रोजी विभागीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी