शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पाणीटंचाई निवारणाचे आराखडे सादर करण्यात उदासीनता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:24 IST

पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे सादर करण्याच्या कामात संबंधित यंत्रणांची उदासीनता समोर येत आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे सादर करण्याचे गत महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले; मात्र सहा तालुक्यांतील कृती आराखडे अद्याप सादर करण्यात आले नसल्याने, जानेवारी ते जून या कालावधीचा जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे सादर करण्याच्या कामात संबंधित यंत्रणांची उदासीनता समोर येत आहे. त्यानुषंगाने अपर जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह (सीईओ) संबंधित यंत्रणांना पत्र देत कृती आराखडे सादर करण्याचे निर्देश १९ नोव्हेंबर रोजी दिले.जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत १५ आणि १७ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसह तहसीलदार आणि गटविकास अधिकाºयांना देण्यात आले; परंतु तेल्हारा तालुका वगळता जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाºयांच्या संयुक्त स्वाक्षरीचे पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे अद्याप जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जानेवारी ते जून या कालावधीसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे सादर करण्याच्या कामात संबंधित यंत्रणेची उदासीनता समोर येत आहे. या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह संबंधित यंत्रणांना पत्राद्वारे दिले.दोन टप्प्यातील असे प्रलंबित आहेत आराखडे!जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या दोन टप्प्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाला; मात्र अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांतील पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे अद्याप प्रलंबित आहेत.विभागीय आयुक्तांनी दिले निर्देश!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचे कृती आराखडे अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. यासंदर्भात दखल घेत पाणीटंचाई निवारणाचे आराखडे तातडीने प्राप्त करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांनी २० नोव्हेंबर रोजी विभागीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी