शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 13:28 IST

आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे १५ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

अकोला : राज्यात ‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले असून, गत महिनाभरात राज्यात स्वाइन फ्लूचे १५ बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक आणि नागपूरमधील सर्वाधिक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका बसत असून, नागरिकांनी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असून, विविध आजारांनी डोके वर काढले आहे. इतर संसर्गजन्य आजारांसोबतच स्वाइन फ्लूच्या लक्षणांमुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे १५ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. गत महिनाभरात राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यासह राज्यातील इतर भागात ‘स्वाइन फ्लू’सदृश रुग्णांची संख्याही वाढली आहे; परंतु यातील बहुतांश रुग्णांना उपचारातून दिलासा मिळाल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. असे असले तरी नागरिकांनी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास स्वाइन फ्लूचा धोका टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.नऊ महिन्यांत २१२ जणांचा बळीराज्यात गत नऊ महिन्यांत स्वाइन फ्लूच्या २,२०७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ९० पेक्षा जास्त रुग्णांवर राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गतवर्षी शंभरपेक्षा जास्त रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ५१ हजार ९८९ व्यक्तींना स्वाइन फ्लूचे लसीकरण करण्यात आले आहे.ही आहेत लक्षणेसर्दी, ताप, अंगदुखी, घशात खवखवणे, छातीत दुखणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे आढळून येतात.अकोल्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून सर्दी, ताप, घसादुखी यांसारखे आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाSwine Flueस्वाईन फ्लू