शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

राज्यात ‘स्वाइन फ्लू’चा पुन्हा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 13:28 IST

आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे १५ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

अकोला : राज्यात ‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले असून, गत महिनाभरात राज्यात स्वाइन फ्लूचे १५ बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक आणि नागपूरमधील सर्वाधिक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका बसत असून, नागरिकांनी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असून, विविध आजारांनी डोके वर काढले आहे. इतर संसर्गजन्य आजारांसोबतच स्वाइन फ्लूच्या लक्षणांमुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे १५ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. गत महिनाभरात राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यासह राज्यातील इतर भागात ‘स्वाइन फ्लू’सदृश रुग्णांची संख्याही वाढली आहे; परंतु यातील बहुतांश रुग्णांना उपचारातून दिलासा मिळाल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. असे असले तरी नागरिकांनी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास स्वाइन फ्लूचा धोका टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.नऊ महिन्यांत २१२ जणांचा बळीराज्यात गत नऊ महिन्यांत स्वाइन फ्लूच्या २,२०७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ९० पेक्षा जास्त रुग्णांवर राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गतवर्षी शंभरपेक्षा जास्त रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील ५१ हजार ९८९ व्यक्तींना स्वाइन फ्लूचे लसीकरण करण्यात आले आहे.ही आहेत लक्षणेसर्दी, ताप, अंगदुखी, घशात खवखवणे, छातीत दुखणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे आढळून येतात.अकोल्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून सर्दी, ताप, घसादुखी यांसारखे आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाSwine Flueस्वाईन फ्लू