शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

‘स्वाभिमानी’ने तोडली महावितरण कार्यालयाची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 10:56 IST

Swabhiman Shetkari Sanghatna स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी थेट महावितरणच्या बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाचीच वीज तोडून टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांकडून महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे. देयकाचा भरणा केला नाही म्हणून थेट फीडरवरून वीजपुरवठा बंद करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी थेट महावितरणच्या बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाचीच वीज तोडून टाकली. १५ मार्च रोजी दुपारी तुपकर यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरणच्या अभियंत्यांसह कर्मचारीही गोंधळून गेले होते. सोबतच महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना तुपकरांनी केबिनमध्येच डांबून ठेवले होते.दरम्यान, जोपर्यंत खंडित करण्यात आलेली वीज जोडणी पूर्ववत जोडली जात नाही, तोवर अधीक्षक अभियंत्यांच्या केबिनमधून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. परिणामी महावितरणने दुपारपर्यंत ६० वीज रोहित्रांचा तोडलेला वीजपुरवठा पूर्ववत केला होता. मात्र सर्वच जोडण्या पूर्ववत करण्याची मागणी आक्रमकपणे तुपकरांनी रेटल्यामुळे अधिकारी वर्गालाही गप्प व्हावे लागले.अलीकडील काळात अशा प्रकारचे हे एक आक्रमक आंदोलन म्हणावे लागेल. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. त्यातच मुख्यालयाची वीज तोडल्याने कार्यालय अंधारात होते.  शेतकऱ्यांना अंधारात ठेवाल तर तुम्हाला उजेडात राहू देणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही या वेळी तुपकरांनी अधिकाऱ्यांना दिला होता. महावितरणच्या या मोहिमेच्या विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी केली होती. तसे झाल्यास महावितरणचीच वीज खंडित करू, असा इशारा त्या वेळी तुपकरांनी दिला होता. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह थेट महावितरणचे जिल्हा मुख्य कार्यालय गाठत तेथील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली होती. शेतकऱ्यांना लाखांची दिली गेलेली देयके ते टप्प्याटप्प्याने भरत आहेत. मात्र वसुलीसाठी शेतकऱ्यांना जोरजबरदस्ती करू नका अन्यथा शेतकरी भडकतील, असा इशाराही तुपकर यांनी या वेळी अधीक्षक अभियंता यांना दिला. त्यांची आक्रमकता पाहता देवहाते यांनी अमडापूर फिडरवरील ६० वीज रोहित्रांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत केला. उर्वरित ठिकाणचाही वीजपुरवठा जोडण्याचे काम सुरू होते. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, पवन देशमुख, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, शेख रफिक शेख करीम, अंकुश सुसर, गोटू जेऊघाले यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

तुम्ही पण अंधारातच राहा!‘आम्ही अंधारात तर तुम्ही पण अंधारात’ या भूमिकेतून आमचा शेतकरी आता वागेल. वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित केला गेला तर आम्हीही महावितरण कार्यालयाची वीज कापू, असा इशारा तुपकरांनी दिला आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असेही तुपकर म्हणाले. दरम्यान, अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतरही सक्तीने वीज देयकांय्या वसुलीचे ऊर्जामंत्री वक्तव्य करतात. त्यामुळे सरकारमध्येच आपसात ताळमेळ नसल्याची टीका तुपकर यांनी केली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा