शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

‘स्वाभिमानी’ने तोडली महावितरण कार्यालयाची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 10:56 IST

Swabhiman Shetkari Sanghatna स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी थेट महावितरणच्या बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाचीच वीज तोडून टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांकडून महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे. देयकाचा भरणा केला नाही म्हणून थेट फीडरवरून वीजपुरवठा बंद करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी थेट महावितरणच्या बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाचीच वीज तोडून टाकली. १५ मार्च रोजी दुपारी तुपकर यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरणच्या अभियंत्यांसह कर्मचारीही गोंधळून गेले होते. सोबतच महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना तुपकरांनी केबिनमध्येच डांबून ठेवले होते.दरम्यान, जोपर्यंत खंडित करण्यात आलेली वीज जोडणी पूर्ववत जोडली जात नाही, तोवर अधीक्षक अभियंत्यांच्या केबिनमधून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. परिणामी महावितरणने दुपारपर्यंत ६० वीज रोहित्रांचा तोडलेला वीजपुरवठा पूर्ववत केला होता. मात्र सर्वच जोडण्या पूर्ववत करण्याची मागणी आक्रमकपणे तुपकरांनी रेटल्यामुळे अधिकारी वर्गालाही गप्प व्हावे लागले.अलीकडील काळात अशा प्रकारचे हे एक आक्रमक आंदोलन म्हणावे लागेल. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. त्यातच मुख्यालयाची वीज तोडल्याने कार्यालय अंधारात होते.  शेतकऱ्यांना अंधारात ठेवाल तर तुम्हाला उजेडात राहू देणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही या वेळी तुपकरांनी अधिकाऱ्यांना दिला होता. महावितरणच्या या मोहिमेच्या विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी केली होती. तसे झाल्यास महावितरणचीच वीज खंडित करू, असा इशारा त्या वेळी तुपकरांनी दिला होता. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह थेट महावितरणचे जिल्हा मुख्य कार्यालय गाठत तेथील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली होती. शेतकऱ्यांना लाखांची दिली गेलेली देयके ते टप्प्याटप्प्याने भरत आहेत. मात्र वसुलीसाठी शेतकऱ्यांना जोरजबरदस्ती करू नका अन्यथा शेतकरी भडकतील, असा इशाराही तुपकर यांनी या वेळी अधीक्षक अभियंता यांना दिला. त्यांची आक्रमकता पाहता देवहाते यांनी अमडापूर फिडरवरील ६० वीज रोहित्रांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत केला. उर्वरित ठिकाणचाही वीजपुरवठा जोडण्याचे काम सुरू होते. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, पवन देशमुख, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, शेख रफिक शेख करीम, अंकुश सुसर, गोटू जेऊघाले यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

तुम्ही पण अंधारातच राहा!‘आम्ही अंधारात तर तुम्ही पण अंधारात’ या भूमिकेतून आमचा शेतकरी आता वागेल. वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित केला गेला तर आम्हीही महावितरण कार्यालयाची वीज कापू, असा इशारा तुपकरांनी दिला आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असेही तुपकर म्हणाले. दरम्यान, अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतरही सक्तीने वीज देयकांय्या वसुलीचे ऊर्जामंत्री वक्तव्य करतात. त्यामुळे सरकारमध्येच आपसात ताळमेळ नसल्याची टीका तुपकर यांनी केली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा