शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘स्वाभिमानी’ने तोडली महावितरण कार्यालयाची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 10:56 IST

Swabhiman Shetkari Sanghatna स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी थेट महावितरणच्या बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाचीच वीज तोडून टाकली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांकडून महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली सुरू केली आहे. देयकाचा भरणा केला नाही म्हणून थेट फीडरवरून वीजपुरवठा बंद करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी थेट महावितरणच्या बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाचीच वीज तोडून टाकली. १५ मार्च रोजी दुपारी तुपकर यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरणच्या अभियंत्यांसह कर्मचारीही गोंधळून गेले होते. सोबतच महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना तुपकरांनी केबिनमध्येच डांबून ठेवले होते.दरम्यान, जोपर्यंत खंडित करण्यात आलेली वीज जोडणी पूर्ववत जोडली जात नाही, तोवर अधीक्षक अभियंत्यांच्या केबिनमधून हलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. परिणामी महावितरणने दुपारपर्यंत ६० वीज रोहित्रांचा तोडलेला वीजपुरवठा पूर्ववत केला होता. मात्र सर्वच जोडण्या पूर्ववत करण्याची मागणी आक्रमकपणे तुपकरांनी रेटल्यामुळे अधिकारी वर्गालाही गप्प व्हावे लागले.अलीकडील काळात अशा प्रकारचे हे एक आक्रमक आंदोलन म्हणावे लागेल. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. त्यातच मुख्यालयाची वीज तोडल्याने कार्यालय अंधारात होते.  शेतकऱ्यांना अंधारात ठेवाल तर तुम्हाला उजेडात राहू देणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही या वेळी तुपकरांनी अधिकाऱ्यांना दिला होता. महावितरणच्या या मोहिमेच्या विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांचीही भेट घेत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याची मागणी केली होती. तसे झाल्यास महावितरणचीच वीज खंडित करू, असा इशारा त्या वेळी तुपकरांनी दिला होता. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह थेट महावितरणचे जिल्हा मुख्य कार्यालय गाठत तेथील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली होती. शेतकऱ्यांना लाखांची दिली गेलेली देयके ते टप्प्याटप्प्याने भरत आहेत. मात्र वसुलीसाठी शेतकऱ्यांना जोरजबरदस्ती करू नका अन्यथा शेतकरी भडकतील, असा इशाराही तुपकर यांनी या वेळी अधीक्षक अभियंता यांना दिला. त्यांची आक्रमकता पाहता देवहाते यांनी अमडापूर फिडरवरील ६० वीज रोहित्रांचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत केला. उर्वरित ठिकाणचाही वीजपुरवठा जोडण्याचे काम सुरू होते. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, पवन देशमुख, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, शेख रफिक शेख करीम, अंकुश सुसर, गोटू जेऊघाले यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

तुम्ही पण अंधारातच राहा!‘आम्ही अंधारात तर तुम्ही पण अंधारात’ या भूमिकेतून आमचा शेतकरी आता वागेल. वीजपंपाचा वीजपुरवठा खंडित केला गेला तर आम्हीही महावितरण कार्यालयाची वीज कापू, असा इशारा तुपकरांनी दिला आहे. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असेही तुपकर म्हणाले. दरम्यान, अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानंतरही सक्तीने वीज देयकांय्या वसुलीचे ऊर्जामंत्री वक्तव्य करतात. त्यामुळे सरकारमध्येच आपसात ताळमेळ नसल्याची टीका तुपकर यांनी केली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा