शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पोलीस अधीक्षक थेट साधणार फिर्यादींसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:18 IST

हा आगळा-वेगळा प्रयोग राज्यातील पहिलाच असल्याचे मानले जात आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यासाठी येणाऱ्या फिर्यादींना टाळाटाळ करून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी बरेचदा समोर येत असल्याने आता फिर्यादींसोबतची पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची वागणूक तपासण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी फिर्याद देण्यासाठी आलेल्या प्रत्येकास फोन करून त्यांच्याकडून स्वत: माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा आगळा-वेगळा प्रयोग राज्यातील पहिलाच असल्याचे मानले जात आहे.जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मनात पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर होऊन पोलीस तसेच जनता यांचे संबंध वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सकारात्मक पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आलेल्या फिर्याद दाखल करण्यास आलेल्या फिर्यादीासोबत त्याच दिवशी सायंकाळी ते संवाद साधत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाची बाजू जाणून घेऊन त्यांची तक्रार घेण्यासाठी पोलिसांना योग्य संवाद ठेवावा लागणार आहे. अन्यथा एखाद्या फिर्यादीस टाळाटाळ केल्यास किंवा त्याची तक्रार न घेतल्याची माहिती फिर्यादीने त्याच दिवशी सायंकाळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासोबत साधलेल्या संवादात दिली, तर या गैरकारभाराची चिरफाड पोलीस अधीक्षक स्वत: करणार आहेत. या प्रयोगामुळे आता ठाणेदार यांचा ताण वाढला असला तरी खाबुगिरी करणाºया पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरू झाली आहे.सकारात्मक पाऊलजी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारताच आधी पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती केली. पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट सक्ती आणि त्यांचा वापर सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येकाला हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.

नियंत्रण कक्षातून ठेवणार वॉचपोलीस दलात पारदर्शकता यावी यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष येथून वॉच ठेवण्यात येणार असून, त्यासाठी चार प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. यानुसार तक्रारीची तत्काळ दखल घेतली का, एफआयआयरची प्रत देण्यात आली का, तक्रारीनुसारच तक्रार घेण्यात आली का, फिर्यादीस पोलीस स्टेशनमध्ये चांगली वागणूक मिळाली का? यानुसार दररोज घडलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीची विचारपूस करून त्या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची पडताळणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस