शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या शेतकऱ्यावरही आत्महत्येची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:27 IST

खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या शेतकºयाच्या बाबतीतही सरकारी अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.

अकोला: राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात जमीन मोबदल्याची रक्कम कमी मिळाल्याच्या प्रकरणात पारित आदेशामध्ये जमीन मोबदल्याची रक्कम वाढवून देण्यात आली नसल्याने, सोमवार, ५ आॅगस्ट रोजी सहा शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांचाही समावेश आहे. खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या शेतकºयाच्या बाबतीतही सरकारी अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शासनामार्फत भूसंपादन करण्यात आले. भूसंपादनापोटी जमिनीचा मोबदला कमी मिळाल्याने, जमीन मोबदल्याची वाढीव रक्कम मिळण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले होते. अपीलवर सुनावणीनंतर अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी पारित केलेल्या आदेशामध्ये जमीन मोबदल्याची रक्कम वाढवून देण्यात आली नसल्याने, नीळंकठराव काशीराव देशमुख (पैलपाडा), अर्चना भारत टकले (कान्हेरी गवळी), आशीष मदन हिवरकर (कान्हेरी गवळी), मुरलीधर प्रल्हाद राऊत (शेळद), मोहम्मद अफजल गुलामनबी रंगारी, साजिद इकबाल शेख महेमूद सर्व रा. बाळापूर इत्यादी सहा शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.विष प्राशन केलेल्या सहा शेतकºयांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर ‘मराठा’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रात्री टॅÑव्हल्स जेवणासाठी थांबतात. नोटबंदीच्या काळात रोख रकमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांकडे जेवणासाठी पैसे नसायचे. त्या कालावधीत शेतकरी मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केले होते. पंतप्रधानांनी कौतुक केलेले मुरलीधर राऊत यांच्या मालकीच्या हॉटेलची जमीन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जमिनीचा अत्यंत अल्प मोबदला मिळाल्याने, वाढीव मोबदल्यासाठी मुरलीधर राऊत सरकारकडे पाठपुरावा करीत होते. याच मागणीसाठी इतरही शेतकरी प्रशासनाकडे दाद मागत होते; मात्र जमिनीचा वाढीव मोबदला मिळत नसल्याने, सरकारी अनास्थेला कंटाळून पंतप्रधानांनी कौतुक केलले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यासह सहा शेतकºयांनी ५ आॅगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीMan ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी