शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या शेतकऱ्यावरही आत्महत्येची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:27 IST

खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या शेतकºयाच्या बाबतीतही सरकारी अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.

अकोला: राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात जमीन मोबदल्याची रक्कम कमी मिळाल्याच्या प्रकरणात पारित आदेशामध्ये जमीन मोबदल्याची रक्कम वाढवून देण्यात आली नसल्याने, सोमवार, ५ आॅगस्ट रोजी सहा शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांचाही समावेश आहे. खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या शेतकºयाच्या बाबतीतही सरकारी अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शासनामार्फत भूसंपादन करण्यात आले. भूसंपादनापोटी जमिनीचा मोबदला कमी मिळाल्याने, जमीन मोबदल्याची वाढीव रक्कम मिळण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले होते. अपीलवर सुनावणीनंतर अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी पारित केलेल्या आदेशामध्ये जमीन मोबदल्याची रक्कम वाढवून देण्यात आली नसल्याने, नीळंकठराव काशीराव देशमुख (पैलपाडा), अर्चना भारत टकले (कान्हेरी गवळी), आशीष मदन हिवरकर (कान्हेरी गवळी), मुरलीधर प्रल्हाद राऊत (शेळद), मोहम्मद अफजल गुलामनबी रंगारी, साजिद इकबाल शेख महेमूद सर्व रा. बाळापूर इत्यादी सहा शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.विष प्राशन केलेल्या सहा शेतकºयांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर ‘मराठा’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रात्री टॅÑव्हल्स जेवणासाठी थांबतात. नोटबंदीच्या काळात रोख रकमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांकडे जेवणासाठी पैसे नसायचे. त्या कालावधीत शेतकरी मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केले होते. पंतप्रधानांनी कौतुक केलेले मुरलीधर राऊत यांच्या मालकीच्या हॉटेलची जमीन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जमिनीचा अत्यंत अल्प मोबदला मिळाल्याने, वाढीव मोबदल्यासाठी मुरलीधर राऊत सरकारकडे पाठपुरावा करीत होते. याच मागणीसाठी इतरही शेतकरी प्रशासनाकडे दाद मागत होते; मात्र जमिनीचा वाढीव मोबदला मिळत नसल्याने, सरकारी अनास्थेला कंटाळून पंतप्रधानांनी कौतुक केलले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यासह सहा शेतकºयांनी ५ आॅगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीMan ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी