शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या शेतकऱ्यावरही आत्महत्येची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:27 IST

खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या शेतकºयाच्या बाबतीतही सरकारी अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.

अकोला: राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात जमीन मोबदल्याची रक्कम कमी मिळाल्याच्या प्रकरणात पारित आदेशामध्ये जमीन मोबदल्याची रक्कम वाढवून देण्यात आली नसल्याने, सोमवार, ५ आॅगस्ट रोजी सहा शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांचाही समावेश आहे. खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या शेतकºयाच्या बाबतीतही सरकारी अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शासनामार्फत भूसंपादन करण्यात आले. भूसंपादनापोटी जमिनीचा मोबदला कमी मिळाल्याने, जमीन मोबदल्याची वाढीव रक्कम मिळण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले होते. अपीलवर सुनावणीनंतर अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी पारित केलेल्या आदेशामध्ये जमीन मोबदल्याची रक्कम वाढवून देण्यात आली नसल्याने, नीळंकठराव काशीराव देशमुख (पैलपाडा), अर्चना भारत टकले (कान्हेरी गवळी), आशीष मदन हिवरकर (कान्हेरी गवळी), मुरलीधर प्रल्हाद राऊत (शेळद), मोहम्मद अफजल गुलामनबी रंगारी, साजिद इकबाल शेख महेमूद सर्व रा. बाळापूर इत्यादी सहा शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.विष प्राशन केलेल्या सहा शेतकºयांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर ‘मराठा’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रात्री टॅÑव्हल्स जेवणासाठी थांबतात. नोटबंदीच्या काळात रोख रकमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांकडे जेवणासाठी पैसे नसायचे. त्या कालावधीत शेतकरी मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केले होते. पंतप्रधानांनी कौतुक केलेले मुरलीधर राऊत यांच्या मालकीच्या हॉटेलची जमीन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जमिनीचा अत्यंत अल्प मोबदला मिळाल्याने, वाढीव मोबदल्यासाठी मुरलीधर राऊत सरकारकडे पाठपुरावा करीत होते. याच मागणीसाठी इतरही शेतकरी प्रशासनाकडे दाद मागत होते; मात्र जमिनीचा वाढीव मोबदला मिळत नसल्याने, सरकारी अनास्थेला कंटाळून पंतप्रधानांनी कौतुक केलले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यासह सहा शेतकºयांनी ५ आॅगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीMan ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी