शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लॉकडाऊन’ काळात जनतेला मदत करण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 15:12 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली मदत नागरिकांना मिळेल यासाठी तत्पर रहावे ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. 

अकोला : लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला होत असलेला त्रास दूर करण्यासाठी व आवश्यक ती मदत करण्यासाठी काँग्रेस प क्षाचे राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मदत करीत असल्याची व या मदतीचे स्वरूप वाढविणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली आहे.

        राज्याचे महसूल मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्य क्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारीजिल्हाध्य क्षखासदारआमदार व सर्व फ्रंटल व सेलचे अध्य क्ष यांना पत्र लिहून सर्वसामान्य जनतेला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी पदाधिका-यांना उद्देशुन लिहिलेल्या पत्रात नमुद केले आहे कीसर्वांना अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचल्या पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत गरीब लोकांना अन्नधान्य, औषधे व जीवनावश्यक वस्तू मिळतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गहू, तांदूळ, डाळ, औषधे आदी वस्तूंचे वाटप काँग्रेस पक्षाच्या वतीने केले पाहिजे. हे वाटप करताना अनावश्यक गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळलाच पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी छोटे गट करून सोशल मीडियाचा वापर करून स्वत:चे व इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घेऊन हे काम करावे. शेतक-यांना शेतमालाची काढणी करताना, शेतमालाची विक्री करताना काही अडचणी आल्यास तपासून त्या मार्गी लावाव्यात. दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाचे संकलन करताना काही अडचणी येत असतील तर त्याही मार्गी लावाव्यात आणि शेतक-यांना मदत करावी. अत्यावश्यक सेवा वगळता खाजगी आस्थापने, बांधकाम क्षेत्र, तात्पुरती कामे सर्व स्थगित केलेली आहे. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या कामगारांची उपासमार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी. सर्व सरकारी आणि खासगी दवाखाने रुग्णांना व्यवस्थित आरोग्य सेवा देतील याचीही काळजी घेणे. प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन सुरु करावी.सोशल मिडीयाच्या माध्यमातून हेल्पलाईन क्रमांक जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचवावा. खासगी रूग्णालये बंद आहेत त्यामुळे प्रत्येक पेशंटला वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणे उदा. गर्भवती महिला, नवजात अर्भके, बालके, किमोथेरपी,डायलिलीसचे पेशंट,  ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे देणे. गरिब लोकांना सॅनिटायझरचे वाटप करणे. आवश्यकता असेल त्यांना मास्कचे वाटप करावे. बेघर तसेच ज्यांच्या जेवण्याची सोय नाही त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणे. यासोबतच या कठिण काळात काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा व लोकसभा सदस्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून आपल्या मतदारसंघ आणि राज्यातील दवाखान्यांना कोरोनाचा मुकाबल्यासाठी सज्ज करण्यासाठी मदत करावी. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांनी आपल्या मतदारसंघात आणि राज्यात लोकांना मदत करणारे उपक्रम राबवावेत. जिल्हा काँग्रेसने ब्लॉक काँग्रेस कमिट्यांना सूचना देऊन केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेली मदत नागरिकांना मिळेल यासाठी तत्पर रहावे ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात