शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:49 IST

शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री पुरुषोत्तम रुपानी यांच्यासमोर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनात मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतीचे नियोजन व उत्तम व्यवस्थापन केल्यास उत्पादन दुप्पट होते; परंतु त्यासाठी योग्य तंत्रज्ञान व मार्गदर्शनाची गरज आहे. ही गरज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व यूपीएलने पूर्ण केल्याची यशोगाथा वºहाडातील शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री पुरुषोत्तम रुपानी यांच्यासमोर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनात मांडली.यूपीएलच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला ना. रुपानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासह व्यासपीठावर आ. गोवर्धन शर्मा, माजी महापौर विजय अग्रवाल, सीसीएफआय आणि यूपीएलचे अध्यक्ष रज्जूभाई श्राफ, उपाध्यक्ष सॅन्ड्रा श्राफ, अजित कुमार, प्रताप रणखांब, समीर टंडन, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ.डी. एम. मानकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सूरज ओहाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांनी यशोगाथा सादर केल्या. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील पातखेड येथील शेतकरी जगन्नाथ कुचर यांनी दोन एकरात यावर्षी ३० क्विंटल कापूस उत्पादन घेतल्याचे सांगितले. विशेष म्हणजे कोरडवाहू क्षेत्र असल्याचे ते म्हणाले. यासाठी शेतकरी शेतीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन करू न नियमित सर्वेक्षण करावे लागते. गत तीन वर्षापूर्वी कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप वाढला होता.त्यामुळे आम्ही हतबल झालो होेतो; परंतु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, यूपीएल आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे यावर्षी नियोजन व व्यवस्थापन केले. त्याचा फायदा झाला. यवतमाळ जिल्ह्यातील बोधगव्हाण येथील शेतकरी ओंकार राऊत यांनी यशोगथा कथन करताना कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतल्याचे सांगितले. यूपीएल व कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. येथे उपस्थित शेतकºयांना रज्जूभाई श्राफ म्हणाले, आपला देश कृषी क्षेत्रात अग्रगण्य आहे.व्यवस्थित तंत्रज्ञान वापरल्यास उत्पादनात वाढ होऊन देश विकास साधता येईल. गरिबीवर मात करायची असेल तर उत्पादन वाढवावे लागणार आहे. शेतकरी हुशार आहेत. त्यांना जे सांगितले त्याचा अवलंब करतात; परंतु त्यासाठी तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे श्रॉफ यांनी सांगितले.पश्चिम विदर्भातून शेतकºयांची उपस्थितीबुलडाणा जिल्ह्यतील सोयगाव येथील शेतकरी विष्णू बुधवंत यांनी मक्याचे विक्रमी उत्पादन घेतल्याचे सांगितले. यूपीएलच्या लष्करी अळी प्रतिबंधक उपाययोजना केल्या. कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन लाभल्याने या अळीवर नियंत्रण मिळविता आले. यवतमाळ जिल्ह्यातील राजेश इंगोले यांनीही कपाशी पिकाच्या विक्रमी उत्पादनाची माहिती दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी