शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची जागा व्यापण्याची 'वंचित'ची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:21 IST

वंचित बहुजन आघाडीने प्रती आंदोलन करून भाजपासह काँग्रेस महाआघाडीलाही निशाण्यावर घेतले.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेचा लाभ व पीक कर्जाचे वाटप या मुद्यावरून भारतीय जनता पक्षाने सोमवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाच्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन व ‘भाजपा से किसान बचाओ’ अभियान हाती घेऊन प्रती आंदोलन छेडले. खरे तर एखाद्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी प्रती आंदोलन छेडण्याची बाब नवी नाही; मात्र अकोल्याच्या राजकारणाच्या पृष्ठभूमीवर या आंदोलनाचे ‘टायमिंग’ साधण्यामागे विरोधी पक्षाची जागा व्यापण्याची रणनीती असल्याचे स्पष्ट होते. राज्यातील काँग्रेस महाआघाडीचे त्रांगडे अन् केंद्रात सत्तेत असलेला भाजप यामुळे या चारही पक्षांना एकमेकांवर टीका करताना फारच सावध राहावे लागत आहे. याचा फायदा घेत गेल्या काही दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीने विरोधकांची जागा घेतल्याचे दिसत आहे.भारतीय जनता पार्टी-शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीला पर्याय देण्याच्या प्रयत्नातून लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला.लोकसभा निवडणुकीत या दोन्ही आघाड्यांच्या विरोधात वंचितला यश मिळाले नसले तरी वंचितमुळे विजयाची समीकरणे बदलली यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नवा करिष्मा घडवेल, अशी अटकळ बांधल्या गेली ती सपशेल फोल ठरली. विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेने काँग्रेस, राष्टÑवादी काँग्र्रेसला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपकडे विरोधी पक्षाची भूमिका आली. या सत्तास्थापनेनंतर जिल्ह्यातील राजकारणाचीही समीकरणे बदलली आहेत.भाजप हा विरोधी पक्षात असला तरी पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात मिळालेला विजय अन् संजय धोत्रे यांच्या रूपाने केंद्रात असलेले राज्यमंत्रीपद यामुळे भाजपला सत्तेचा आधार आहेच. कोरोना संकट, कापसाची खरेदी, पीक कर्जवाटप याबाबत भाजपाने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठविला; मात्र भाजपला एखाद्या प्रश्नावर आंदोलन करताना केंद्राच्या उत्तरदायित्वाला आव्हान दिले जाणार नाही याचे भान ठेवून आंदोलनाची तीव्रता व व्याप्ती ठरवावी लागत आहे. त्यातही चार आमदार भाजपाचे असल्याने लोकांच्या प्रश्नाची तड लावण्याची जबाबदारी त्यांना नाकारता येत नाही, त्यामुळे विरोधाची धार फारशी तीव्र दिसत नाही. भाजपाच्या विरोधात सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहच एवढा आहे की, भाजपाने राज्य सरकाराच्या विरोधात आंदोलन पुकारल्यावरही दोन्ही काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे शांतताच होती, तर शिवसेनेने हे आंदोलनच बेदखल केले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने प्रती आंदोलन करून भाजपासह काँग्रेस महाआघाडीलाही निशाण्यावर घेतले.अलीकडच्या काही घटनांचा आढावा घेतला तर वंचित बहुजन आघाडीने कोरोनासारख्या संवेदनशील व आरोग्याच्या प्रश्नावर थेट प्रशासनाला धारेवर धरून प्रश्न उपस्थित केले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला थेट विरोध करण्याचीही भूमिका या पक्षाने घेतली होती हे विशेष! हा सर्व प्रकार विरोधकांची जागा व्यापण्याचा असून, त्याच दृष्टीने वंचितची रणनीती असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणAkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर