शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

सावरा फाट्यावर शेतक-यांचा ‘रास्ता रोको’

By admin | Updated: June 5, 2017 02:07 IST

बैलबंडी व जनावरे आणून रस्त्यावर कांदे फेकल्याने अकोट-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अकोट : अकोट-अमरावती मार्गावरील सावरा फाट्यावर अचानक रविवारी शेतकर्‍यांनी ह्यरास्ता रोकोह्ण आंदोलन केले. यावेळी बैलबंडी व जनावरे आणून रस्त्यावर कांदे फेकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. सावरा पंचक्रोशीतील मंचनपूर, आसेगाव, देऊळगाव, कवठा, पुंडा, रंभापूर आदी गावांतील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन सरकारविरोधी घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आसेगाव बाजार येथील युवा शेतकरी संजय पुंडकर यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी सात-बारा कोरा करा, दुधाला योग्य भाव द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शासनाने पशुधन विमा योजना पुन्हा सुरू करावी, शेतीसाठी अखंड मोफत वीज पुरवठा व ठिबक सिंचनला अनुदान मिळावे आदी मागण्यांकरिता आंदोलन छेडण्यात आले. ह्यरास्ता रोकोह्णमुळे एकच खळबळ उडाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहने अडकून पडली होती. आठवडी बाजारात अकोटला जाणारे व्यापारीसुद्धा अडकले होते. यावेळी शेतकर्‍यांनी अत्यावश्यक सेवा असलेली वाहने जाऊ दिली. आंदोलनामुळे मोठय़ा प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकरी, शेतमजूर गावकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याने अडकून पडलेल्यांनी नि:श्‍वास टाकला.पोलिसांचे वरातीमागून घोडेसावरा फाट्यावर शेतकर्‍यांनी अचानक एकत्र येऊन रास्ता रोको केला. या आंदोलनाची भनक नसल्याने पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. रस्त्यावर बैलबंडी व जनावरे असल्याने प्रारंभी रास्ता रोको असल्याचे कोणाच्याही लक्षातच आले नाही. जनावरे व बैलबंडीमुळे वाहतूक विस्कळीत झाली, असे वाहनधारकांना वाटल्याने वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या; परंतु नंतर शेतकर्‍यांनी घोषणा देत कांदे रस्त्यावर फेकले, पुतळा जाळल्याने शेतकरी आंदोलन असल्याचे समजले. याबाबतची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अब्दागिरेसह पोलीस पोहोचले; मात्र तोपर्यंंत आंदोलन संपले होते. अखेर पोलिसांनी परत येऊन आंदोलनाची पोलीस डायरीत नोंद घेतली.शेतकर्‍यांच्या संपास शेकापचा पाठिंबा अकोला : संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारणार्‍या राज्यातील शेतकर्‍यांच्या आंदोलनास शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. शेतकरी वर्ग कमालीचा आर्थिक अडचणीत असून, कर्जाच्या बोजाखाली दबला आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. हमीभावात माल खरेदी करायला सरकार तयार नाही. अशा परिस्थितीत तातडीचा उपाय म्हणून सरसकट कर्जमाफी ही शेतकर्‍यांची मागणी आहे; परंतु सरकार याबाबत गंभीर नसून, टाळाटाळ करीत असल्यामुळे शेतकर्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांनी पुकारलेल्या या संपास व आंदोलनास शेकापचा पूर्ण पाठिंबा असून, या संपात शेकापच्या कार्यकर्त्यांंनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे विदर्भ विभाग चिटणीस प्रदीप देशमुख व जिल्हा चिटणीस दिनेश काठोके यांनी केले आहे.