शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंदची हाक!

By admin | Updated: January 13, 2015 00:58 IST

दहावी, बारावीच्या परीक्षांवरही बहिष्कार, २ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद.

सचिन राऊत/अकोलाशिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी या संघटनांनी २ फेब्रुवारीपासून बेमुदत शाळा बंदची हाक दिली आहे. राज्यातील २२ हजार शाळांनी राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशारा दिला असून, दहावी व बारावीच्या परीक्षांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. २0१३ मधील अध्यादेश रद्द करून चिपळूणकर समितीच्या शिफारशीनूसार शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदं शाळांमध्ये भरण्यात यावी, २00४ पासून बंद झालेले वेतनेतर अनुदान सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे, शालेय पोषण आहार संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, या योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात यावी, निकषात असणार्‍या नवीन तुकड्यांना १00 टक्के अनुदान देण्यात यावे, यासोबतच सर्व शालेय कर्मचार्‍यांचे वेतन नियमीत करण्याची मागणीही या आंदोलनाव्दारे करण्यात येणार आहे. या मागण्यांसंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राज्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महासंघ, शिक्षण संस्थाचालक संघटनांनी ६ जानेवारी रोजी असहकार आंदोलन केले होते. आता १३ जानेवारी रोजी राज्यातील शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार असून, त्यानंतरही तोडगा न काढल्यास राज्यातील २२ हजार शाळा २ फे ब्रुवारीपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना, शिक्षण संस्थाचालक संघटना व मुख्याध्यापक संघटनेव्दारे देण्यात आला आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यामध्ये यश आले नाही. मागण्या प्रलंबितच असल्याने १३ जानेवारी रोजी राज्यव्यापी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास २ फेब्रुवारीपासून बेमुदत राज्यव्यापी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे सरचिटणीस शिवाजी खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.