शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी शाळा बंदची हाक!

By admin | Updated: January 13, 2015 00:58 IST

दहावी, बारावीच्या परीक्षांवरही बहिष्कार, २ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद.

सचिन राऊत/अकोलाशिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी या संघटनांनी २ फेब्रुवारीपासून बेमुदत शाळा बंदची हाक दिली आहे. राज्यातील २२ हजार शाळांनी राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशारा दिला असून, दहावी व बारावीच्या परीक्षांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. २0१३ मधील अध्यादेश रद्द करून चिपळूणकर समितीच्या शिफारशीनूसार शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदं शाळांमध्ये भरण्यात यावी, २00४ पासून बंद झालेले वेतनेतर अनुदान सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे, शालेय पोषण आहार संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, या योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात यावी, निकषात असणार्‍या नवीन तुकड्यांना १00 टक्के अनुदान देण्यात यावे, यासोबतच सर्व शालेय कर्मचार्‍यांचे वेतन नियमीत करण्याची मागणीही या आंदोलनाव्दारे करण्यात येणार आहे. या मागण्यांसंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राज्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महासंघ, शिक्षण संस्थाचालक संघटनांनी ६ जानेवारी रोजी असहकार आंदोलन केले होते. आता १३ जानेवारी रोजी राज्यातील शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार असून, त्यानंतरही तोडगा न काढल्यास राज्यातील २२ हजार शाळा २ फे ब्रुवारीपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना, शिक्षण संस्थाचालक संघटना व मुख्याध्यापक संघटनेव्दारे देण्यात आला आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यामध्ये यश आले नाही. मागण्या प्रलंबितच असल्याने १३ जानेवारी रोजी राज्यव्यापी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास २ फेब्रुवारीपासून बेमुदत राज्यव्यापी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे सरचिटणीस शिवाजी खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.