शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू

By admin | Updated: February 25, 2017 02:16 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना- भाजप एकत्र येणार?

बुलडाणा, दि. २४- जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २४ जागा मिळविल्या असल्या, तरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बहुमताकरिता भाजपला अजून आठ जागांची गरज असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्हा परिषदेचा निकाल भाजप वगळता सर्वच पक्षांसाठी धक्कादायक ठरला. भाजप वगळता एकाही पक्षाच्या जागा वाढल्या नसून, कमी झाल्या आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६0 असून, बहुमतासाठी ३१ सदस्य असणे आवश्यक आहे. भाजपला २४ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी त्यांना सात सदस्यांची गरज आहे. शिवसेनेला १0 जागा मिळाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही आठ जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजप अन्य कोणताही पर्याय निवडण्याऐवजी शिवसेनेचा पाठिंबा घेईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेनाही अनेक वर्षे विरोधात असल्यामुळे सत्तेत सहभागी होण्याकरिता आसुसली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत यावेळी भाजप व शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपत असल्यामुळे त्यापूर्वी अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी महिलाकरिता आरक्षित झाले आहे. त्यामुळे आरक्षण लक्षात घेऊनच अनेक ओबीसी महिलांनी निवडणूक लढविली. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी झालेल्या ओबीसी महिलांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. जिल्हा परिषदेत भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या ओबीसी महिला सदस्यांची अध्यक्ष पद मिळविण्याकरिता रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपकडून श्‍वेता महाले, मालूबाई मानकर, रूपाली काळपांडे, जयश्री टिकार, उमाताई तायडे या ओबीसी महिला विजयी झाल्या आहेत. गड आला पण सिंह गेला!गुरुवारी पार पडलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेत सातपैकी सात जागांवर यश संपादन करता आले. त्याचवेळी पंचायत समितीवरदेखील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मात्र, त्याचवेळी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते शांताराम बोधे हे पंचायत समिती गटात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपची अवस्था ह्यगड आला पण सिंह गेलाह्ण अशी झाल्याची चर्चा दिवसभर जिल्हात होती. असाही योगायोग!नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी ह्यमानकरह्ण या नावानेच म्हणजेच प्रभाग क्रमांक १ मधील भाग्यश्री विक्रम मानकर यांच्यापासून भाजपच्या विजयाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच्या विजयाची सुरुवात मानकर याच नावाने झाली. जिल्हा परिषद गटात मालुबाई ज्ञानदेवराव मानकर या सर्वप्रथम विजयी झाल्या. पालिकेत भाग्यश्री यांच्यामुळे, तर जिल्हा परिषदेत मालुबाई यांच्या रुपाने भाजपला ह्यपरिवर्तनाह्णचा ह्यमानह्ण मिळाल्याची चर्चा आहे.