शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू

By admin | Updated: February 25, 2017 02:16 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना- भाजप एकत्र येणार?

बुलडाणा, दि. २४- जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २४ जागा मिळविल्या असल्या, तरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बहुमताकरिता भाजपला अजून आठ जागांची गरज असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्हा परिषदेचा निकाल भाजप वगळता सर्वच पक्षांसाठी धक्कादायक ठरला. भाजप वगळता एकाही पक्षाच्या जागा वाढल्या नसून, कमी झाल्या आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६0 असून, बहुमतासाठी ३१ सदस्य असणे आवश्यक आहे. भाजपला २४ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी त्यांना सात सदस्यांची गरज आहे. शिवसेनेला १0 जागा मिळाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही आठ जागा मिळाल्या आहेत. मात्र, भाजप अन्य कोणताही पर्याय निवडण्याऐवजी शिवसेनेचा पाठिंबा घेईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेनाही अनेक वर्षे विरोधात असल्यामुळे सत्तेत सहभागी होण्याकरिता आसुसली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत यावेळी भाजप व शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपत असल्यामुळे त्यापूर्वी अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी महिलाकरिता आरक्षित झाले आहे. त्यामुळे आरक्षण लक्षात घेऊनच अनेक ओबीसी महिलांनी निवडणूक लढविली. यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी झालेल्या ओबीसी महिलांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. जिल्हा परिषदेत भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या ओबीसी महिला सदस्यांची अध्यक्ष पद मिळविण्याकरिता रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपकडून श्‍वेता महाले, मालूबाई मानकर, रूपाली काळपांडे, जयश्री टिकार, उमाताई तायडे या ओबीसी महिला विजयी झाल्या आहेत. गड आला पण सिंह गेला!गुरुवारी पार पडलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेत सातपैकी सात जागांवर यश संपादन करता आले. त्याचवेळी पंचायत समितीवरदेखील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मात्र, त्याचवेळी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते शांताराम बोधे हे पंचायत समिती गटात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भाजपची अवस्था ह्यगड आला पण सिंह गेलाह्ण अशी झाल्याची चर्चा दिवसभर जिल्हात होती. असाही योगायोग!नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी ह्यमानकरह्ण या नावानेच म्हणजेच प्रभाग क्रमांक १ मधील भाग्यश्री विक्रम मानकर यांच्यापासून भाजपच्या विजयाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच्या विजयाची सुरुवात मानकर याच नावाने झाली. जिल्हा परिषद गटात मालुबाई ज्ञानदेवराव मानकर या सर्वप्रथम विजयी झाल्या. पालिकेत भाग्यश्री यांच्यामुळे, तर जिल्हा परिषदेत मालुबाई यांच्या रुपाने भाजपला ह्यपरिवर्तनाह्णचा ह्यमानह्ण मिळाल्याची चर्चा आहे.