शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

राज्यात सात ठिकाणी एकलव्य निवासी शाळा सुरू

By admin | Updated: May 8, 2015 01:42 IST

केंद्र शासनाने राज्य स्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांंना दज्रेदार शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या निवासी शाळा योजनेंतर्गत राज्यात सात ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत एकलव्य निवासी शाळा चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आल्या आहेत. देशभरातील आदिवासी जातीच्या विद्यार्थ्यांंना चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने केंद्र शासनाने राज्य स्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यात २00१ पासून आदिवासी विद्यार्थ्यांंसाठी नाशिक, ठाणे जिल्हय़ातील कांबळगाव, अमरावती जिल्हय़ातील चिखलदरा व नागपूर जिल्हय़ातील खैरीपरसोडा येथे इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंंत एकलव्य निवासी शाळा सुरू केल्या. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात २0१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून पिंप्रीसद्रोद्दिन, ता. इगतपुरी, जि. नाशिक, नंदूरबार, ता.जि. नंदूरबार, बोरगाव, ता. देवरी, जि. गोंदिया, तुमरगुंडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली येथे, तर वर्ष २0१५- १६ या शैक्षणिक वर्षापासून शेंडगाव (भातसानगर), ता. शहापूर, जि. ठाणे, अजमेर सौंदाने, ता. सटाना. जि. नाशिक व मावेशी (राजूर), ता. अकोले, जि. अहमदनगर या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता ६ वी ते १२ पर्यंंतच्या शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या सर्व शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांंना शिक्षण दिले जाईल. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येईल. त्याशिवाय निवास, अंथरुण-पांघरुण, भोजन, गणवेश, पाठय़पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य मोफत पुरविले जाईल. या शाळांमध्ये ३0 मुले व ३0 मुली, अशा एकूण ६0 विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीत प्रवेश दिला जाईल. प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेऊन गुणानुक्रमानुसार विद्यार्थ्यांंची निवड करण्यात येणार आहे.