शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा संप मिटला ; सगळ्यांच्या हाताला काम, सगळ्यांनाच दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 12:20 IST

ST strike ends; Work in everyone's hands : पाचही आगारांमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता चालक व वाहकांना काम मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडून केले जातेय नियोजन गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर लालपरीची प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. सर्वच कर्मचारी रुजू झाल्यानंतर उपलब्ध बसगाड्या व फेऱ्यांची संख्या पाहता चालक व वाहकांना काम मिळेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती; परंतु जिल्ह्यातील पाचही आगारांमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता चालक व वाहकांना काम मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

एसटीच्याअकोला विभागातील अकोला जिल्ह्यात अकोला क्र. १, अकोला क्र. २, अकोट, मूर्तिजापूर व तेल्हारा असे पाच आगार आहेत. या आगारांमध्ये संपानंतर सर्वच कर्मचारी कामावर परतले आहेत. एसटीमध्ये काम नाही तर दाम नाही अशी पद्धत आहे. अकोला विभागातील ७० बस भंगार झाल्याने एकूण बसगाड्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी पूर्वीच्या तुलनेत फेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत चालक व वाहकांना काम देण्याचे नियोजन करताना आगार प्रमुखांची कसरत होत आहे; परंतु अपवाद वगळता सर्वांना कामगिरी दिली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

 

कोणत्या आगारात किती बस, किती कर्मचारी?

आगार -             रोजच्या फेऱ्या -             चालक/वाहक

अकोला क्र. १ - १५२ -             १६२

अकोला क्र. २ - १०२ -             १९८

अकोट - १५५ -             १८९

मूर्तिजापूर - ९३ -             ११५

तेल्हारा - १४० -             १४३

 

सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळतेय रोज काम

अकोला जिल्ह्यातील पाच आगारांमध्ये जवळपास ८०७ चालक व वाहक आहेत. संपानंतर सर्वच वाहक व चालक रुजू झाले आहेत. गत दोन वर्षांत आगारांमधील बसगाड्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे फेऱ्यांचे नियोजन करून सर्वच कर्मचाऱ्यांना काम देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात

 

 

संपानंतर सर्वच कर्मचारी कामावर परतले असून, सर्वांना कामगिरी मिळणे गरजेचे आहे. बहुतांश चालक व वाहकांना कामगिरी मिळत आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या दिवशी कामगिरी मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याची भरपाई केली जाते.

- सचिन गव्हाळे, संघटना पदाधिकारी

 

आमच्या आगारात सर्वच कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळत आहे. कामगिरीबाबत कोणत्याही तक्रारी नाहीत. संप मिटल्यानंतर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांनाच काम मिळत आहे.

- दिनेश गावंडे, एसटी कर्मचारी

 

 

उपलब्ध बसगाड्यांनुसार फेऱ्यांचे नियोजन करून प्रत्येक कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता उन्हाळी सुट्यांमध्ये फेऱ्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबाबत काही समस्या नाही.

- श्रीकांत गभने, प्रभारी वाहतुक नियंत्रक, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी