शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:35 IST

तेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यात गावागावांतील शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या व्यथातेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.अडसूळ फाटा येथून ती दहीगाव येथे आल्यावर मोठी सभा झाली. शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधाबाबत विचार मांडले. त्यानंतर यात्रा  दुपारी  थार, गाडेगाव, बेलखेड येथे गेली. तेथेही शेतकर्‍यांना मार्गदर्शन व चर्चा पार पडली. चितलवाडी, अडगाव बु., येथे संध्याकाळी चर्चासत्र होऊन नंतर सवाद यात्रा अकोट येथे गेली. या यात्रेतील सभांमध्ये अनिल गावंडे यांनी भारताच्या ६,४0,८६७ खेड्यात आजही ६0 टक्के जनता राहते. या जनतेचा प्रामुख्याने कृषी आणि कृषीपूरक उद्योग हाच व्यवसाय आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांत आपण ग्रामीण भागाच्या प्रगतीचा आलेख अभ्यासला, तर तो उणेच दिसेल. शेती आणि शेतकर्‍यांच्या शोषणात या प्रश्नाचे मूळ आहे. पण, या सोबतच अजून खूप सारे ग्रामीण भागातील प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहेत. ग्रामीण भागातील कोट्यवधी शेतकरी अजून कोणकोणते  शेतीविरोधी कायदे अस्तित्वात आहेत, यापासूनही अनभिज्ञ आहेत. आज आमची शेतकर्‍यांची मुलं शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून घरी बसली आहेत. आमच्या मुली बसच्या पासला १000 रुपये नाहीत म्हणून आत्महत्या करत आहेत. कित्येक गावाचे प्रश्न फक्त आणि फक्त राजकारणामुळे वर्षानुवर्षे स्थगित आहेत. तेव्हा ग्रामीण भागासाठी तळमळ असलेल्या प्रत्येक माणसाला आज एकत्र येऊन पुन्हा ग्रामीण भागाशी संवाद साधण्याची गरज आहे आणि तेच काम संवाद यात्रेद्वारे करणार आहोत. या प्रवासात आम्ही विदर्भातील पाच जिल्ह्यातील किमान ५0 गावे आणि गावकर्‍यांचे प्रश्न समजून घेणार आहोत. यात्रा संपल्यावर ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मांडण्यात येतील, असे सांगितले. यावेळी प्रत्येक गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संवाद यात्रेदरम्यान अभिजित फाळके, अनिल गावंडे, ललित बहाडे, पुरुषोत्तम आवारे पाटील,  अँड.  सुधाकर खुमकर,  डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे उपस्थित होते.