शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

शेतकरी संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:35 IST

तेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यात गावागावांतील शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या व्यथातेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.अडसूळ फाटा येथून ती दहीगाव येथे आल्यावर मोठी सभा झाली. शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधाबाबत विचार मांडले. त्यानंतर यात्रा  दुपारी  थार, गाडेगाव, बेलखेड येथे गेली. तेथेही शेतकर्‍यांना मार्गदर्शन व चर्चा पार पडली. चितलवाडी, अडगाव बु., येथे संध्याकाळी चर्चासत्र होऊन नंतर सवाद यात्रा अकोट येथे गेली. या यात्रेतील सभांमध्ये अनिल गावंडे यांनी भारताच्या ६,४0,८६७ खेड्यात आजही ६0 टक्के जनता राहते. या जनतेचा प्रामुख्याने कृषी आणि कृषीपूरक उद्योग हाच व्यवसाय आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांत आपण ग्रामीण भागाच्या प्रगतीचा आलेख अभ्यासला, तर तो उणेच दिसेल. शेती आणि शेतकर्‍यांच्या शोषणात या प्रश्नाचे मूळ आहे. पण, या सोबतच अजून खूप सारे ग्रामीण भागातील प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहेत. ग्रामीण भागातील कोट्यवधी शेतकरी अजून कोणकोणते  शेतीविरोधी कायदे अस्तित्वात आहेत, यापासूनही अनभिज्ञ आहेत. आज आमची शेतकर्‍यांची मुलं शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून घरी बसली आहेत. आमच्या मुली बसच्या पासला १000 रुपये नाहीत म्हणून आत्महत्या करत आहेत. कित्येक गावाचे प्रश्न फक्त आणि फक्त राजकारणामुळे वर्षानुवर्षे स्थगित आहेत. तेव्हा ग्रामीण भागासाठी तळमळ असलेल्या प्रत्येक माणसाला आज एकत्र येऊन पुन्हा ग्रामीण भागाशी संवाद साधण्याची गरज आहे आणि तेच काम संवाद यात्रेद्वारे करणार आहोत. या प्रवासात आम्ही विदर्भातील पाच जिल्ह्यातील किमान ५0 गावे आणि गावकर्‍यांचे प्रश्न समजून घेणार आहोत. यात्रा संपल्यावर ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मांडण्यात येतील, असे सांगितले. यावेळी प्रत्येक गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संवाद यात्रेदरम्यान अभिजित फाळके, अनिल गावंडे, ललित बहाडे, पुरुषोत्तम आवारे पाटील,  अँड.  सुधाकर खुमकर,  डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे उपस्थित होते.