शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शेतकरी संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:35 IST

तेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यात गावागावांतील शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या व्यथातेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.अडसूळ फाटा येथून ती दहीगाव येथे आल्यावर मोठी सभा झाली. शेतकरी बांधवांनी पिकांवर येणारे विविध रोग, अवर्षण, अडचणी, भारनियमन, सिंचन सुविधाबाबत विचार मांडले. त्यानंतर यात्रा  दुपारी  थार, गाडेगाव, बेलखेड येथे गेली. तेथेही शेतकर्‍यांना मार्गदर्शन व चर्चा पार पडली. चितलवाडी, अडगाव बु., येथे संध्याकाळी चर्चासत्र होऊन नंतर सवाद यात्रा अकोट येथे गेली. या यात्रेतील सभांमध्ये अनिल गावंडे यांनी भारताच्या ६,४0,८६७ खेड्यात आजही ६0 टक्के जनता राहते. या जनतेचा प्रामुख्याने कृषी आणि कृषीपूरक उद्योग हाच व्यवसाय आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांत आपण ग्रामीण भागाच्या प्रगतीचा आलेख अभ्यासला, तर तो उणेच दिसेल. शेती आणि शेतकर्‍यांच्या शोषणात या प्रश्नाचे मूळ आहे. पण, या सोबतच अजून खूप सारे ग्रामीण भागातील प्रश्नसुद्धा अनुत्तरित आहेत. ग्रामीण भागातील कोट्यवधी शेतकरी अजून कोणकोणते  शेतीविरोधी कायदे अस्तित्वात आहेत, यापासूनही अनभिज्ञ आहेत. आज आमची शेतकर्‍यांची मुलं शिक्षणासाठी पैसा नाही म्हणून घरी बसली आहेत. आमच्या मुली बसच्या पासला १000 रुपये नाहीत म्हणून आत्महत्या करत आहेत. कित्येक गावाचे प्रश्न फक्त आणि फक्त राजकारणामुळे वर्षानुवर्षे स्थगित आहेत. तेव्हा ग्रामीण भागासाठी तळमळ असलेल्या प्रत्येक माणसाला आज एकत्र येऊन पुन्हा ग्रामीण भागाशी संवाद साधण्याची गरज आहे आणि तेच काम संवाद यात्रेद्वारे करणार आहोत. या प्रवासात आम्ही विदर्भातील पाच जिल्ह्यातील किमान ५0 गावे आणि गावकर्‍यांचे प्रश्न समजून घेणार आहोत. यात्रा संपल्यावर ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मांडण्यात येतील, असे सांगितले. यावेळी प्रत्येक गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संवाद यात्रेदरम्यान अभिजित फाळके, अनिल गावंडे, ललित बहाडे, पुरुषोत्तम आवारे पाटील,  अँड.  सुधाकर खुमकर,  डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, विलास ताथोड, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे उपस्थित होते.