शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सोयाबीनचे पंचनामे संथ गतीने; मदत अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:40 IST

सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी वाढतच असून, सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सद्यस्थितीत सुरू आहेत. त्यामध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये महाबीज आणि इतर विविध खासगी बियाणे कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच, बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे कृषी विभागामार्फत सुरू असलेले काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची मदत मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खासगी कंपन्यांकडून भरपाईवर प्रश्नचिन्ह!शासनाच्या निर्देशानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्यासंदर्भात ‘महाबीज’कडून कार्यवाही सुरू करण्यात आली असली तरी; खासगी बियाणे कंपन्यांकडून मात्र शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना खासगी बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२,४७३ तक्रारी; पंचनामे ४३०!४अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या २ हजार ४७३ शेतकºयांकडून ६ जुलैपर्यंत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, त्यापैकी केवळ ४३० शेतकºयांच्या तक्रारींचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्यासंदर्भात पंचनामे करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी