शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनने व-हाडातील शेतक-यांना केले गारद !

By admin | Updated: October 16, 2014 00:57 IST

एकरी सरासरी दोन क्विंटल उत्पादन; पण दाणे निघाले अपरिपक्कव; पेरणीचा निम्मा खर्च निघणे कठीण.

राजरत्न सिरसाट/ अकोलाविदर्भातील वीस लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक हातचे गेले असून, एकरी सरासरी दोन िक्ंवटल उत्पादन होत नसल्याचे पाहून शेतकरी गारद झाला आहे. पेरणीचा खर्च तर निघणारच नाही, सोयाबीन काढणीचा खर्चही पेलवत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी दोन महिने उशिरा पाऊस आल्याने पेरण्यांना विलंब झाला. या प्रतिकुल परिस्थि तीमध्येही शेतकर्‍यांनी पश्‍चिम विदर्भात १५.५0 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. ऑगस्ट व सप्टेबर महिन्यात सुरू वातीचे दोन दिवस १२४ व ९0 मि.मी. पाऊस झाला; पंरतु त्यांनतर पावसाने दडी मारल्याने पिकांवर परिणाम झाला. अनेक किडींनी िपकाला ग्रासले, रसशोषण करणार्‍या कीडी प्रामुख्याने कापसावर हल्ला करतात; परंतु यावर्षी प्रथमच या किडीने सोयाबीन पिकावर हल्ला केला. त्यामुळे अचानक पिके वाळली, पाने पिवळी पडली. परिपक्वतेच्या अवस्थेत आलेल्या या पिकाला पाण्याची नितांत गरज होती; परंतु यावर्षी पाऊस तर नव्हताच आणि परतीच्या पावसानेदेखील पाठ फिरविल्याने पिकाचे दाणे भरले नाहीत. त्यामुळे उत्पादन घटले असून, सोयाबीनचे हे पिक अपरिपक्वअवस्थेतच पूर्ण वाळले आहे. या परिस्थितीने शेतकरी गारद झाला असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.यावर्षी पावसाअभावी पेरणी उशिरा झाली आणि नंतर परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाने दडी मारली. प्रथमच या पिकावर रसशोषण करणार्‍या किडीचाही प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनला फटका बसला असून, उत्पादन घटले आहे. परिणामी अनेक ठिकाणी एकरी दोन ते तीन क्विंटलच्यावर उत्पादन होत नसल्याचे चित्र आहे. जिथे संरक्षित सिंचनाची व्यवस्था होती, तिथे सोयाबीन चांगले आले; परंतु हे प्रमाण एक टक्कयाच्यावर नसल्याचे प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ.सी.यु.पाटील यांनी स्पष्ट केले. *मशागत ते पेरणीचा खर्च एकरी पंधरा हजार शेतीची मशागत ते पेरणीचा खर्च सरासरी पंधरा हजार रू पये येतो. यावर्षी तर दुबार, तिबार पेरणी आणि किटकनाशकांचा खर्च वाढल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले. यंदा सोयाबीनला ३२00 रू पये प्रति क्विंटल हमी भाव आहे. बाजारपेठेत कमाल भाव ३५00 रू पये प्रति क्विंटल आहे. यावर्षी एकरी सरासरी दोन क्विंटल उत्पादन होत आहे आणि दाणे परिपक्वनसल्याने भावात घसरण झाली आहे. मळणी आणि काढणीचा खर्च दोन हजार रू पये आहे. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.*शेतकर्‍यांवर मोठं संकटयावर्षी मूग, उडीद हे पीक शेतकर्‍यांना घेता आले नाही, कापूस हे पीक शेतकर्‍यांनी कमी केले आहे. सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती; तथापि या पिकाने शेतकर्‍यांची घोर निराशा केली आहे. सोयाबीन काढणीचा खर्च एकरी १६00 रूपये आणि मळणीचा खर्च प्रति िक्ंवटल ३00 रूपये आहे. हमी भाव प्रति क्विंटल ३२00 रूपये असले तरी सध्या बाजारात २९00 रू पये प्रतिक्विंटल भाव आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणेदेखील कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. ते नुकसान यापेक्षा जास्त आहे.