शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जनसामान्यांच्या अडचणी सोडवा, संघटित व्हा, एकत्र या; दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By आशीष गावंडे | Updated: October 4, 2023 22:14 IST

शेतीसाठी व वैयक्तिक कर्ज सुविधा देण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

आशिष गावंडे, अकोला: जनसामान्यांच्या समस्या व अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचा. त्यासाठी संघटित हाेऊन एकत्र येण्याचे आवाहन सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. 

राज्याचे सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील अकोला शहरात बुधवारी सायंकाळी दाखल झाले असता त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी आयाेजित केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच आढावा बैठकीला मार्गदर्शन केले. अवघ्या पाच ते सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश वळसे पाटील यांनी दिले. पक्ष संघटन मजबूत करून प्रत्येक प्रभागासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची सूचनाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केली. आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आहोत. त्यामुळे भूतकाळात न जाता अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाला बळ देण्याचे काम करावे, असे सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण, माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे, विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी विचार व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार तुकाराम बिडकर, वाशिम जिल्हाअध्यक्ष युसुफ पुंजवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महानगराध्यक्ष विजयराव देशमुख, निखील ठाकरे, रायुकाॅंचे शहर अध्यक्ष अजय मते आदी उपस्थित होते. 

सहकार कायद्यात सुधारणा करणार

शेतीसाठी व वैयक्तिक कर्ज सुविधा देण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सेवा सहकारी साेसायट्यांचे कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरु राहील, त्यामध्ये काेणताही नवीन बदल केला जाणार नसल्याचे सांगत वळसे पाटील यांनी आश्वस्त केले. दरम्यान, काही दिवसांपासून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे. अशावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी वादग्रस्त प्रकरणांमध्ये लक्ष न देता एकाेप्याने राहण्याची गरज असल्याचे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी नमुद केले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील