शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आतापर्यंत ६० टक्केच सोयाबीन बियाणे बाजारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:10 IST

येत्या मेअखेर सर्व बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे महाबीजचे म्हणणे आहे.

अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाचे आतापर्यंत ६० टक्के सोयाबीन बियाणे बाजारात पोहोचले आहे. ३० टक्के मूग, उडीद बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मात्र सोयाबीन बियाणे हवे आहे. येत्या मेअखेर सर्व बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे महाबीजचे म्हणणे आहे.गतवर्षीचा पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसल्याने हेक्टरी उतारा कमी लागला आहे. पावसाने बियाणे काळे पडले आहे. यामुळे राज्यात यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचे बियाणे पेरणीसाठी वापरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे कृषी विभागासह शेतकºयांची चिंता वाढली आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३८ लाख हेक्­टर आहे. महाबीजकडे चार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ज्यात जवळपास ८ ते ९ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. बियाणे कंपन्या किती बियाणे उपलब्ध करतात, यावर अवलंबून आहे. बियाणे उपलब्ध झाले तरी त्याची उगवण क्षमता किती, हे तपासावे लागणार आहे. सध्या तापमान वाढल्याने सोयाबीन बियाणे उगवण क्षमता ७० हून ६५ टक्क्यांपर्यंत आली आहे. सद्यस्थितीत ६० टक्के बियाणे महाबीजने उपलब्ध केले. दरम्यान, सोयाबीन बियाण्याची कमतरता भासत असल्याने यावर्षी महाबीजने २५ हजार क्विंटल बियाणे बाहेरून खरेदी करण्यासाठीची निविदा मागविली आहे; पण हे बियाणे अद्याप महाबीजकडे पोहोचले नाही. यावर्षी महाबीजने सोयाबीनचे दर तीन ते चार टक्के वाढविले आहे. आतापर्यंत ६० टक्के सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध केले असून, वाहतुकीचा प्रश्न असल्याने अगोदर बाहेरच्या गावांना बियाणे पाठविण्यात आले आहे. मेअखेर सर्व बियाण्याचा पुरवठा होईल.-अजय कुचे, महाव्यवस्थापक (विपणन) महाबीज, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीMahabeejमहाबीजFarmerशेतकरी