शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

रात्रीचे जागरण आरोग्यास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:50 IST

अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासोबतच मधुमेह, ह्रदय विकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे

अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासोबतच मधुमेह, ह्रदय विकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. वयाच्या तिशीनंतर हा धोका सर्वाधिक असल्याने वेळीच जीवनशैली बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.एका अभ्यासानुसार, रात्री झोप नीट न मिळाल्याने किंवा रात्रभर जागरण झाल्याने मनुष्याच्या डीएनएचा आकार बदलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवी डीएनएच्या रचनेत बदल झाल्यास कर्करोगासह मधुमेह व इतर गंभीर आजाराची शक्यता वाढते. बदलत्या जीवनशैलीचा हा सर्वाधिक घातक परिणाम आहे. चुकीच्या जीवनशैलीचा सर्वात जास्त धोका वयाच्या तिशीनंतर आहे. या बदलांमुळेच कमी वयात कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास हा प्रकार किती धोकादायक आहे आणि रात्रीची झोप किती महत्त्वाची आहे, हे या संशोधनामुळे स्पष्ट झाले.या आजारांचा धोका

  • कर्करोग
  • मधुमेह
  • हृदयाचे विकार
  • मज्जातंतूचे विकार
  • श्वासनलिकेसंदर्भात विकार

नेटकऱ्यांसाठी धोक्याची घंटाबहुतांश तरुणाई रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर व्यस्त असते. रात्री उशिरापर्यंत नेट सर्फिंगमुळे होणारे जागरण आणि अवेळी जेवण हा प्रकार नेटकºयांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच चुकीच्या सवयी बदलून निरोगी आयुष्य जगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.निरोगी आरोग्यासाठी हे करा!

  1. किमान सात ते आठ तास झोप घ्या.
  2. रात्री १२ च्या आत जेवण करा.
  3. रात्रीचे जेवण हलके व पचणार असेच घ्या.
  4. पौष्टिक आहार घ्या.
  5. भरपूर पाणी प्या.
  6. मॉर्निंग वॉकची सवय लावा.
  7. नियमित व्यायाम करा.
  8. चुकीच्या सवयी बदला.

रात्रीचे जागरण हे आरोग्यासाठी घातकच आहे. झोप न घेणे म्हणजे विविध आजारांना निमंत्रण देणे आहे. हा धोका टाळण्यासाठी चुकीच्या सवयी बदला. रात्री बाराच्या आधी जेवण आणि झोपणे आवश्यक आहे. जेणे करून किमान सात ते आठ तासांची झोप होईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealth Tipsहेल्थ टिप्स