शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

रात्रीचे जागरण आरोग्यास घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:50 IST

अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासोबतच मधुमेह, ह्रदय विकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे

अकोला : बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासोबतच मधुमेह, ह्रदय विकारासारख्या आजारांचा धोका वाढला आहे. वयाच्या तिशीनंतर हा धोका सर्वाधिक असल्याने वेळीच जीवनशैली बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.एका अभ्यासानुसार, रात्री झोप नीट न मिळाल्याने किंवा रात्रभर जागरण झाल्याने मनुष्याच्या डीएनएचा आकार बदलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवी डीएनएच्या रचनेत बदल झाल्यास कर्करोगासह मधुमेह व इतर गंभीर आजाराची शक्यता वाढते. बदलत्या जीवनशैलीचा हा सर्वाधिक घातक परिणाम आहे. चुकीच्या जीवनशैलीचा सर्वात जास्त धोका वयाच्या तिशीनंतर आहे. या बदलांमुळेच कमी वयात कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास हा प्रकार किती धोकादायक आहे आणि रात्रीची झोप किती महत्त्वाची आहे, हे या संशोधनामुळे स्पष्ट झाले.या आजारांचा धोका

  • कर्करोग
  • मधुमेह
  • हृदयाचे विकार
  • मज्जातंतूचे विकार
  • श्वासनलिकेसंदर्भात विकार

नेटकऱ्यांसाठी धोक्याची घंटाबहुतांश तरुणाई रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर व्यस्त असते. रात्री उशिरापर्यंत नेट सर्फिंगमुळे होणारे जागरण आणि अवेळी जेवण हा प्रकार नेटकºयांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच चुकीच्या सवयी बदलून निरोगी आयुष्य जगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.निरोगी आरोग्यासाठी हे करा!

  1. किमान सात ते आठ तास झोप घ्या.
  2. रात्री १२ च्या आत जेवण करा.
  3. रात्रीचे जेवण हलके व पचणार असेच घ्या.
  4. पौष्टिक आहार घ्या.
  5. भरपूर पाणी प्या.
  6. मॉर्निंग वॉकची सवय लावा.
  7. नियमित व्यायाम करा.
  8. चुकीच्या सवयी बदला.

रात्रीचे जागरण हे आरोग्यासाठी घातकच आहे. झोप न घेणे म्हणजे विविध आजारांना निमंत्रण देणे आहे. हा धोका टाळण्यासाठी चुकीच्या सवयी बदला. रात्री बाराच्या आधी जेवण आणि झोपणे आवश्यक आहे. जेणे करून किमान सात ते आठ तासांची झोप होईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealth Tipsहेल्थ टिप्स