शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

‘एसडीओं’च्या निवासस्थानी वृक्षांची कत्तल!

By admin | Updated: July 13, 2017 01:20 IST

चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाला हरताळ

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पपुर्तीदरम्यान अकोट येथील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) उदय राजपूत यांच्या शासकीय निवासस्थान परिसरातील हिरव्या वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने १२ जुलै रोजी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकारामुळे चार कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाला खुद्द शासकीय अधिकारीच हरताळ फासत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाशी दुटप्पी धोरण ठेवणाऱ्या या प्रकारामुळे जनतेत व निसर्गप्रेमीत चुकीचा संदेश जात असून, शासनाने या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.सिंधी कॅम्प परिसरात महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांचे निवासस्थान आहे. या परिसरात विविध जातीचे लहान-मोठे हिरवेगार वृक्ष आहेत. त्यापैकी आठ ते दहा वृक्षांची कटाई नुकतीच केली असल्याचे या स्टिंगमध्ये दिसून आले आहे. काही झाडे बुंध्यापासून कापण्यात आली, तर काही मोठ्या झाडांची कटाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाळलेले निंबाचे मोठे झाड मात्र कापण्यात आले नाही. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, या निवासस्थान परिसरातील निंबाची तीन झाडे वाळलेली असल्याचे दाखवित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सरनायक यांनी १ जुलै रोजी (चार कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी) त्या निंबाच्या झाडांचा विमाश्रगृहावर लिलाव केला होता. त्यानंतर लिलाव घेतलेल्या लोकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील निंबाची दोन मोठी झाडे बुंध्यासह कापली, तर एक वाळलेले झाड न कापता इतर सहा झाडांची कटाई करून लाकडे लंपास केली. खरे तर या परिसरात केवळ एकच निंबाचे वाळलेले झाड होते; ते पुरावा म्हणून कायम ठेवून उर्वरित हिरव्या झाडांची कटाई करण्यात आली. खुद्द उपविभागीय अधिकारी राहत असलेल्या कुलूपबंद घरामधील एका झाडाचा कटाईमध्ये समावेश आहे. त्यामुळे महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व वृक्षांची कत्तल करणाऱ्या मंडळीच्या संगनमताने हा गंभीर प्रकार जाणीवपूर्वक घडला असल्याचे सिद्ध होत आहे. विशेष म्हणजे या हिरव्या झाडांची कटाई केल्यानंतर परिसरातून लाकडे रफादफा करण्यात आली, तर काही झाडांच्या बुंध्यावर माती टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. राज्यातील वनाच्छादनाचे प्रमाण सध्या १६ टक्के इतके आहे. वस्तुत: ३३ टक्के वृक्षाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी जवळपास ४०० कोटी वृक्ष लावावे लागतील. ३३ टक्के वृक्षाच्छादनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सुरुवात म्हणून २०१६ मध्ये १ जुलै रोजी २ कोटी ८३ लाख वृक्ष राज्यभरात लावण्यात आले. यावर्षी चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य होते; परंतु शासनाचे विविध विभाग एकीकडे वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती करीत असताना दुसरीकडे वृक्षाची कत्तल करणारे ठरत असल्याने शासनाच्या संकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.या वृक्षतोडीबाबत अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला; परंतु त्यांनी फोन न उचलल्यामुळे या वृक्षतोडीबाबत त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.पडताळणीशिवाय झाडांचा लिलाव!सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सरनायक यांनी वृक्षांच्या लिलावाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अकोला, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता भुबरे यांना देण्यात आली; परंतु कोणीही या लिलावातील झाडांची पडताळणी केली नसल्याचे घडलेल्या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. शिवाय, तीन झाडांचा लिलाव असताना वाळलेले एक झाड सोडून हिरव्या वृक्षांची लाकडे तोडल्याने यामध्ये भ्रष्ट आर्थिक व्यवहाराची शक्यता सकृतदर्शनी निर्दशनात येत आहे. शासनाचा चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सप्ताह सुरू असताना झाडाचा लिलाव करणे योग्य राहणार नाही, याकडेसुद्धा कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे वृक्षांबाबत कोणालाच सोयरसुतक नसल्याची बाब समोर येत आहे.सध्या मी सुटीवर आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्यावरच काय प्रकार घडला, ते सांगता येईल.- सुरेश भुबरे,शाखा अभियंता, सा.बां. विभाग, अकोट.