शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटातही राजराजेश्वराला जलाभिषेकाची परंपरा अखंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:37 IST

सकाळी साडेसात वाजता पालखी श्री राजेश्वर मंदिरात येताच भाविकांनी ‘जय भोले, हर हर महादेव’चा जयघोष केला.

अकोला: कोरोना विषाणूच्या सावटातही शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याची परंपरा यंदा कायम ठेवण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देत श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाची एकमेव मानाची पालखी ‘जय भोले’च्या गजरात अतिशय शिस्तबध्द व शांततेने सोमवारी सकाळी ६ वाजता शहरात दाखल झाली. पोलिस बंदोबस्तात मार्गाक्रमण करीत सकाळी साडेसात वाजता पालखी श्री राजेश्वर मंदिरात येताच भाविकांनी ‘जय भोले, हर हर महादेव’चा जयघोष केला.श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्ष पूर्ण होत आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी शहराच्या कानाकोपºयातील शिवभक्त जय्यत तयारी करतात. परंतु यंदा संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा सोहळा आयोजित न करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाला केली होती. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातील भाविक शहरात दाखल होतात. शिवभक्तांच्या भावना लक्षात घेता ही धार्मिक परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशातुन यावर्षी केवळ श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या मानाच्या पालखीला गांधीग्राम येथे जाण्यासाठी परवानगी देण्याच्या निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे शहरातील प्रमुख पालखी व कावड मंडळांनी स्वागत केले. त्यामुळे रविवारी 16 जुलैच्या रात्री निवडक 20 शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री राजेश्वराची पालखी गांधीग्रामकडे मार्गस्थ झाली होती. गांधीग्राम येथे पूर्णा नदीची तसेच मानाच्या पालखीची विधिवत पुजा-अर्चना केल्यानंतर राजेश्वर शिवभक्त मंडळाचे सदस्य वाहनाद्वारे सोमवारी सकाळी ६ वाजता अकोटफैल परिसरातील पाचमोरी येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित पोलीसांनी पालखीचे स्वागत केले.

टॅग्स :AkolaअकोलाRajrajeshwar Templeराजराजेश्र्वर मंदिरIndian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सण