शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; सांयकाळी ५ नंतरही दूकाने सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 10:52 IST

Lockdown in Akola जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सायंकाळ ५ वाजतानंतरही अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसूून येत आहे.

अकाेला : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवारी संपूर्ण संचारबंदीचा आदेश दिला असून, इतर दिवशी दरराेज सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजतापर्यंत सर्व बाजारपेठ खुली ठेवता येणार आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सायंकाळ ५ वाजतानंतरही अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसूून येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार संपूर्ण संचारबंदीचा आदेश दिला आहे. तसेच इतर दिवशी बाजारपेठ सुरू ठेवण्याची परवानगी आहे. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान, सकाळी ९ ते सायंकाळ ५ वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत; मात्र शहरात ५ वाजतानंतरही दुकाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच बाजारपेठेत गर्दी वाढली असून, कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित दुकानचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

बाजारपेठेत वाढली गर्दी; नियमांचे उल्लंघन!

व्यावसायिकांची अडचण लक्षात घेता अटी व शर्थींवर बाजारपेठ खुली ठेवण्याचे आदेश आहेत; मात्र बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. तसेच दुकानात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. ग्राहकांसह दुकानचालक विनामास्क दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे.

 

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची गरज!

प्रतिबंधित वेळेतही बाजारपेठेत दुकाने सुरू असल्याने या दुकानांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक