शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नुकसानभरपाईच्या मागणीसाठी उरळ शेतकरी पुत्रांचे मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:48 IST

उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले.

ठळक मुद्देउरळ गावातील शेतकºयांना मदत दिली जात नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा या युवकांनी दिला आहे. शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही युवक सायंकाळी ५ वाजता टॉवरवरून खाली उतरले.

उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले. जोपर्यंत उरळ गावातील शेतकºयांना मदत दिली जात नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा या युवकांनी दिला आहे. गोपाल अंबादास पोहरे आणि गणेश वामन पोहरे अशी या युवकांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी बोंडअळीची मदत येत्या १५ दिवसात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही युवक सायंकाळी ५ वाजता टॉवरवरून खाली उतरले.गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना शासनाने मदतीची घोषणा केली होती. अनेक गावांना मदतीचे वितरण झाले; मात्र उरळ गावातील एकाही शेतकºयाला मदत मिळाली नाही, तसेच कर्जमाफीचाही लाभ शेतकºयांना मिळाला नाही, त्यामुळे गावातील गोपाल पोहरे आणि गणेश पोहरे यांनी आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही शेतकरी पुत्र सकाळी ११ वाजता गावातील मोबाइल टॉवरवर चढले, तसेच आपल्या मागण्यांविषयी पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी जोपर्यंत आश्वासन देणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी आपल्या सहकाºयांसह घटनास्थळ गाठले, तसेच उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे यांनी उरळ येथे भेट देऊन शेतकºयांच्या खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन दिले; मात्र जोपर्यंत पालकमंत्री अथवा जिल्हाधिकारी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत टॉवरच्या खाली उतरणार नसल्याचा इशारा युवकांनी दिला होता. मात्र, एसडीओ खडसे यांनी बोंडअळीची मदत येत्या १५ दिवसात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे तसेच कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाºयांची शेतकºयांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सायंकाळी दोन्ही युवक टॉवरच्या खाली उतरले. (वार्ताहर) 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagitationआंदोलन