शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

युतीचे शुभमंगल; महाआघाडीची अजूनही बोलणीच सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:54 IST

आघाडीमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंचाही सहभाग असावा, असे प्रयत्न सुरू असले तरी एमआयएम सोबतची मैत्री अन् वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा यामुळे जागा वाटपाचे घोडे अडले आहे.

- राजेश शेगोकार

 अकोला: होणार, नाही होणार, अशा गोंधळात अखेर सर्व रुसवे-फुगवे विसरून भाजपा, शिवसेना युतीचे शुभमंगल झाले. सोमवारी संध्याकाळी मुंबईत युती ‘ठरल्याची’ सुपारी फुटली अन् आतापर्यंतच्या सर्व अटकळी संपुष्टात आल्या. आता महाआघाडीकडे लक्ष लागले आहे. भाजपाचा विजयी वारू रोखण्यासाठी काँग्रेसने सर्व विरोधकांची ताकद एकवटण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, या प्रयत्नांमध्ये अ‍ॅड. आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे. अकोला ही अ‍ॅड. आंबेडकरांची राजकीय राजधानी असल्यामुळे युतीच्या शुभमंगलनंतर आता अकोल्यातील राजकीय वर्तृळाचे लक्ष महाआघाडीकडे लागले आहे.महत्प्रयासाने केंद्रात व राज्यात आलेली सत्ता भाजपाला गमवायची नाही, असा चंग या पक्षाने बांधला असल्यामुळेच युतीसाठी जमिनीवर येत सेनेची मनधरणी केली. अकोला लोकसभा मतदारसंघात सेना-भाजपाचे संबंध हे हवे तेवढे मधुर नसले तरी एकदम टोकाचेही नाहीत. भाजपाने सेनेला गृहीतही न धरता आपली रणनीती यापूर्वीच तयार केलेली आहे. जिल्ह्यातील १ हजार २८८ ‘मतदान केंद्र’ मजबूत करीत निवडणुकीची तयारी सुरू केली. सोबतच विस्तारक ही संकल्पना राबविली. ‘सबका साथ, सबका’ विकास मेळावा असो की आताच झालेले आरोग्य शिबिर असो, अशा अनेक शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा धडाका लावला आहे. पक्षपातळीवर खासदार संजय धोत्रे यांनी व त्यांच्या गटाने अतिशय सक्रिय होत संघटनेवर पकड निर्माण केली असून, धोत्रे यांना पर्याय निर्माण होणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली आहे. भाजपाच्या या तयारीत युतीमुळे सेनेच्या मतांची बेगमीच होणार आहे. आतापर्यंतच्या तीन लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतला असता भाजपाची मते ही चढत्या क्रमाने असून, गेल्या निवडणुकीत तर मोदी इफेक्टमुळे मतांचा विक्रम झाला. भाजपाची अशी दमदार स्थिती असताना शिवसेनेही स्वबळाच्या नाऱ्यामुळे संघटन बांधणीकडे लक्ष दिल्याने या ताकदीचा फायदा भाजपालाच होणार आहे. दुसरीकडे काँग्रेस व भारिप बमसंची मते विभागल्या गेल्याने भाजपाचा विजय अतिशय सुकर झाला. तीच चूक यावेळी होऊ नये म्हणून काँग्रेस समविचारी पक्षांची मोट बांधत आहे.भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे संकेत यापूर्वीच दिले होते. या आघाडीमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंचाही सहभाग असावा, असे प्रयत्न सुरू असले तरी एमआयएम सोबतची मैत्री अन् वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा यामुळे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. आता युती झाल्याने काँग्रेसवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या जागांबाबत काँग्रेस गांभीर्याने विचार करून महाआघाडी होणार का, या निर्णयाकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस