शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

युतीचे शुभमंगल; महाआघाडीची अजूनही बोलणीच सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:54 IST

आघाडीमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंचाही सहभाग असावा, असे प्रयत्न सुरू असले तरी एमआयएम सोबतची मैत्री अन् वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा यामुळे जागा वाटपाचे घोडे अडले आहे.

- राजेश शेगोकार

 अकोला: होणार, नाही होणार, अशा गोंधळात अखेर सर्व रुसवे-फुगवे विसरून भाजपा, शिवसेना युतीचे शुभमंगल झाले. सोमवारी संध्याकाळी मुंबईत युती ‘ठरल्याची’ सुपारी फुटली अन् आतापर्यंतच्या सर्व अटकळी संपुष्टात आल्या. आता महाआघाडीकडे लक्ष लागले आहे. भाजपाचा विजयी वारू रोखण्यासाठी काँग्रेसने सर्व विरोधकांची ताकद एकवटण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, या प्रयत्नांमध्ये अ‍ॅड. आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे. अकोला ही अ‍ॅड. आंबेडकरांची राजकीय राजधानी असल्यामुळे युतीच्या शुभमंगलनंतर आता अकोल्यातील राजकीय वर्तृळाचे लक्ष महाआघाडीकडे लागले आहे.महत्प्रयासाने केंद्रात व राज्यात आलेली सत्ता भाजपाला गमवायची नाही, असा चंग या पक्षाने बांधला असल्यामुळेच युतीसाठी जमिनीवर येत सेनेची मनधरणी केली. अकोला लोकसभा मतदारसंघात सेना-भाजपाचे संबंध हे हवे तेवढे मधुर नसले तरी एकदम टोकाचेही नाहीत. भाजपाने सेनेला गृहीतही न धरता आपली रणनीती यापूर्वीच तयार केलेली आहे. जिल्ह्यातील १ हजार २८८ ‘मतदान केंद्र’ मजबूत करीत निवडणुकीची तयारी सुरू केली. सोबतच विस्तारक ही संकल्पना राबविली. ‘सबका साथ, सबका’ विकास मेळावा असो की आताच झालेले आरोग्य शिबिर असो, अशा अनेक शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा धडाका लावला आहे. पक्षपातळीवर खासदार संजय धोत्रे यांनी व त्यांच्या गटाने अतिशय सक्रिय होत संघटनेवर पकड निर्माण केली असून, धोत्रे यांना पर्याय निर्माण होणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली आहे. भाजपाच्या या तयारीत युतीमुळे सेनेच्या मतांची बेगमीच होणार आहे. आतापर्यंतच्या तीन लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतला असता भाजपाची मते ही चढत्या क्रमाने असून, गेल्या निवडणुकीत तर मोदी इफेक्टमुळे मतांचा विक्रम झाला. भाजपाची अशी दमदार स्थिती असताना शिवसेनेही स्वबळाच्या नाऱ्यामुळे संघटन बांधणीकडे लक्ष दिल्याने या ताकदीचा फायदा भाजपालाच होणार आहे. दुसरीकडे काँग्रेस व भारिप बमसंची मते विभागल्या गेल्याने भाजपाचा विजय अतिशय सुकर झाला. तीच चूक यावेळी होऊ नये म्हणून काँग्रेस समविचारी पक्षांची मोट बांधत आहे.भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे संकेत यापूर्वीच दिले होते. या आघाडीमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंचाही सहभाग असावा, असे प्रयत्न सुरू असले तरी एमआयएम सोबतची मैत्री अन् वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा यामुळे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. आता युती झाल्याने काँग्रेसवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या जागांबाबत काँग्रेस गांभीर्याने विचार करून महाआघाडी होणार का, या निर्णयाकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस