शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पाण्यासाठी शिवसेना आक्रमक; उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:00 IST

अकोला: जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेने ६४ गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अकोट-अकोला मार्गावरील उगवा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

अकोला: खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो. महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना जिल्हा परिषदेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी करीत शिवसेनेने ६४ गावांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत २२ जानेवारी रोजी अकोट-अकोला मार्गावरील उगवा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता-रोको आंदोलनामुळे वाहतुक खोळंबली असून, दोन्ही बाजूंनी दोन ते तीन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.महान धरणातून खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. महान धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असून, ६४ गावांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. तरीसुद्धा संबंधित गावांना तब्बल १८ ते २० दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघ व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. महिन्यातून एकदा संबंधित गावांना पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधारी भारिपने व जि.प. प्रशासनाने ६४ गावांना एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू न केल्यास शिवसेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मागणी मान्य न झाल्यामुळे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या नेतृत्वात सोमवारी उगवा फाट्यावर ‘रास्ता रोको’आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जि.प. सदस्य महादेव गवळे, ज्येष्ठ नेते श्रीरंगदादा पिंजरकर, बंडू ढोरे, मुकेश मुरुमकार, विलास अनासणे, अतुल पवनीकर, ज्योत्सना चोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तोपर्यंत शिवसैनिक उठणार नाहीत!उगवा गावात पाणी पुरवठ्याची कोणतीही सुविधा नाही. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता ६४ गावांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनादरम्यान उगवा फाट्यावरून एकही शिवसैनिक जागेवरून उठणार नसल्याचा सज्जड इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन