शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कापूस, सोयाबीनच्या हमीभावासाठी शिवसेनेची शेतकरी संघर्ष यात्रा; आमदार नितीन देशमुख यांची माहिती

By आशीष गावंडे | Updated: February 9, 2024 20:08 IST

शेतकऱ्यांनी काबाड कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव देण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची असते.

अकोला: धर्माच्या तसेच जातीपातीच्या आडून राजकारण करण्यापेक्षा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सोयाबीन व कापसाच्या हमीभावावर ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या वेदना व समस्या जाणून घेण्यासाठी शासनकर्ते सपशेल कुचकामी ठरल्यामुळेच शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने १५ फेब्रुवारीपासून जिल्हाभरात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

निसर्गाने कितीही अवकृपा केली तरीही शेतकरी हार मानत नाही. शेतकऱ्यांनी काबाड कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव देण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची असते; परंतु शासनकर्त्यांकडूनच शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपाच्या अनेक  मोठ्या नेत्यांनी कापूस, सोयाबीन व इतर पिकांना हमीभाव मिळावा यासाठी कापूस दिंडी काढली होती. त्यावेळी सोयाबीनला सहा हजार रुपये व कापसाला आठ हजार रुपये दर मिळावा अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. आजरोजी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, असे असतानाही सोयाबीन व कापसाला हमीभाव का मिळत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढली जात असल्याची माहिती आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिली. संघर्ष यात्रेदरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार दाळू गुरुजी, मा. आमदार हरिदास भदे, मा. आमदार संजय गावंडे, सेवकराम ताथोड शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील. पत्रकार परिषदेला वरिष्ठ नेते सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, मंगेश काळे, ज्ञानेश्वर म्हैसणे, योगेश्वर वानखडे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, संजय शेळके,शहर प्रमुख अकोला पूर्व राहुल कराळे, आनंद बनचरे ,निरंजन बंड, नितीन ताथोड आदि उपस्थित होते. 

जिल्ह्यात ५०० किलोमीटरचा पायी प्रवासशिवसेनेच्या पायदळ शेतकरी संघर्ष यात्रेला १५ फेब्रुवारीपासून मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरा येथील गाडगे बाबा संस्थान मधून प्रारंभ केला जाणार आहे. जिल्ह्यात ५०० किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर २ मार्च २०२४ रोजी शहराचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिर भागात यात्रेचा समारोप केला जाणार आहे. 

शेतांमध्ये करणार मुक्कामशेतमालाला शासन हमीभाव देत  नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही ३०० पेक्षा अधिक गावांना भेटी देणार असून यादरम्यान शेतांमध्येच मुक्काम करणार असल्याची माहिती नितीन देशमुख यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी