शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

खारपाणपट्टयात शिरपूर पटर्न राबविणार

By admin | Updated: December 10, 2014 23:58 IST

सुहास खानापूरकर यांची लोकमतशी बातचित.

राजरत्न सिरसाट/अकोलाखारपाणपट्टयाचा विस्तार हा अमरावती विभागापुरता र्मयादीत नसून, या खार्‍या पाण्याचे स्त्रोत नंदूरबार जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या खार्‍या पाण्यावर उपाय आणि पाण्याची पातळी वाढावी, याकरीता शिरपूर भागात शास्त्रीय अभ्यासानुसार या भागातील नाल्यावर बंधारे बांधून पावसाच्या पाण्याची साठवण केल्याने भूजल पातळी वाढली असून, शेतकर्‍यांचा वर्षात तीन पिके घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हाच शिरपूर पॅटर्न खारपाणपट्टयात राबविल्यास या भागातील शेतकर्‍यांना, नागरिकांना दिलासा मिळेल, असा आत्मविश्‍वास शिरपूर पॅटर्नचे जनक सुहास खानापूरकर यांनी खास लोकमतशी बातचित करताना व्यक्त केला. सुहास खानापूरकर यांनी शासनाच्या भूजल विज्ञान विभागात भूजल वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. भूर्गभ जलावर त्यांचा सुक्ष्म अभ्यास आहे. त्यांच्या नोकरीच्या कालावधीत त्यांनी अनेक प्रयोग राबविले असून, सेवानवृत्तीनंतर त्यांनी जलचळवळीसाठी स्वत:ला झोकून दिले आहे.प्रश्न- शिरपूर पॅटर्न नेमके काय आहे ? - आपल्याकडे अनेक छोटे मोठे नाले आहेत. या नाल्यांचे खोलीकरण करू न पावसाच्या पाण्याची साठवण करण्यात आली आहे. या भागातील ५५ गावांमध्ये ३२ किलोमिटर अंतरावर १२४ बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधार्‍यात साठलेल्या पाण्यामुळे शिरपूर भागात ६00 फूट खोल असलेले पाणी १0 फुटावर आले असून, २0 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यामुळे पावसाचे साठवलेले पाणी पिकांना संरक्षित ओलित म्हणून तर देण्यात येतच आहे, शिवाय भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढली आहे.प्रश्न- खारपाणपट्टयाचा विस्तार कुठपर्यंत आहे आणि या भागातच तो कसा तयार झाला ? - अमरावती विभागातील खारपाणपट्टा नंदूरबारपर्यंत आहे. दीड लाख वर्षापूर्वी झालेल्या नैसर्गीक घडामोडीचा हा प्रकार आहे. समुद्राचे पाणी या भागात शिरल्याने अमरावती ते नंदूरबारपर्यंत ४00 मैल लांब आणि ४0 फूट खोल खड्डा पडला होता. कालातंराने हा खड्डा माती, गाळाने भरला. म्हणूनच या भागाला पुर्णेच्या गाळाचा प्रदेशही म्हटले जाते. समुद्राच्या पाण्याचे क्षार येथील गोड्या पाण्यात मिसळल्याने या भागातील पाणी खारे असल्याचे आतापर्यंतचे तर्क आहेत.प्रश्न- खारपाणपट्टयात शिरपूर पॅटर्न कसा राबविणार ? - खारपाणपट्टयात पुर्णा नदी सर्वात मोठी आहे. पुर्णा नदीला मिळणार्‍या लहान नाल्यावर ५00 मिटर अंतरावर एक याप्रमाणे बंधारे बांधावे लागणार आहेत. या बंधार्‍यांची खोली २0 फुट ठेवावी लागेल आणि १५ मिटर खोल चरही खोदावे लागतील. यात पावसाचे पाणी साठवायचे आहे.प्रश्न- पाणी साठवून गोडे पाणी मिळणार कसे ? - खारपाणपट्टयात एका नाल्यावर ५00 मिटर अंतरावर एक बंधारा बांधावा लागणार आहे. या बंधार्‍यात साठलेले पाणी जमिनीत जिरण्यास मदत होईल. हे पाणी सतत साचत गेल्याने खारे पाणी खाली जाईल आणि कालातंराने गोडे पाणी वर येईल. यात अनेक शास्त्रीय गोष्टी आहेत. या पध्दतीचे प्रयोग खारपाणपट्टयात राबविण्याचा संकल्प आहे.