शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

मोबाईल नेटवर्क नसलेल्या शेकापूरचा आश्विन यूपीएससी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST

संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यातील शेकापूर येथे साधे मोबाईल नेटवर्कही नाही. अशा खेड्यातून येणाऱ्या आश्विनने उंच भरारी घेतली असून, ...

संतोषकुमार गवई

पातूर : तालुक्यातील शेकापूर येथे साधे मोबाईल नेटवर्कही नाही. अशा खेड्यातून येणाऱ्या आश्विनने उंच भरारी घेतली असून, जिद्द व परिश्रमाच्या जोरावर यूपीएससीची खडतर असलेली परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तालुक्यातील शेकापूर येथील बंजारा तांड्यातील आश्विन बाबूसिंग राठोड यांनी ५२० ही रँक मिळवत डोळे दिपवणारे यश संपादन केले आहे. तालुक्यासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

आश्विन राठोड यांच्या वडिलांचा प्रवासही प्रेरणादायी असून, त्यांनी सुद्धा पोलीस निरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे. ते नुकतेच दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यापुढील आयपीएस अधिकारी पदाचा प्रवास जणूकाही आश्विन राठोड यांनी पूर्ण केला, काहीसे असे चित्र यूपीएससी परीक्षेच्या यशामुळे निर्माण झाले आहे. आश्विन यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ-बहीण आणि शिक्षकांना दिले आहे.

--------------------------

गावात युवकांनी सुरू केली अभ्यासिका

तालुक्यातील शेकापूर हे गाव बंजारा बहुल तांडा वस्तीचे गाव असून, तालुक्यापासून ३० किलोमीटर जिल्ह्यापासून ७५ किलोमीटर अंतरावरील गाव. शेकापूर येथे साधे मोबाईल नेटवर्कही नाही. अशा खेड्यातून शेकापूर येथील युवकांनी अनेक उच्चपदे गाठली आहेत. बाहेरगावाला नोकरी करणाऱ्या युवकांनी पुढाकार घेत गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे. पातूर तालुक्यातील युवकांनी पुढाकार घेऊन अभ्यासिका सुरू करणारे शेकापूर एकमेव गाव आहे. शिक्षणाचा ध्यास घेऊन पुढे जाण्याचे ध्येय समोर ठेवणारे शेकापूर प्रकाशझोतात आले आहे.

------------------------------------------------

शालेय शिक्षण झाले अकोल्यात!

आश्विन बाबूसिंग राठोड यांचे शालेय शिक्षण दहावीपर्यंत हे अकोला येथे पूर्ण झाले. त्यानंतर सेंट पॉल नागपूर व ग्रॅज्युएशन नागपूरच्या मोहता महाविद्यालयात पूर्ण झाले आहे. आश्विनला इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण मिळाले होते. वडील पोलीस खात्यात कार्यरत असल्याने त्यांना वर्दीचे कायम आकर्षण राहले असल्याचे आश्विन राठोड यांनी सांगितले.

-------------------------------

वडील पोलीस खात्यात असल्याने नेहमीच वर्दीचे आकर्षण राहिले आहे. आई-वडील, भाऊ-बहीण व गुरुजणांचे मागर्दर्शन व सतत अभ्यास यामुळेच मी हे यश संपादन केले आहे.

-आश्विन राठोड, शेकापूर.

-------------------------------

आश्विन राठोड याने जिद्द व परिश्रमाच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून शेकापूरसह पातूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.

-सावित्रीबाई हिरासिंग राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा, जिल्हा परिषद अकोला.

--------------

250921\img-20210925-wa0195.jpg

आश्विन राठोड